मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू करून दिली आहे. यातच आता विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“द गद्दार फाईल्स..!” काय म्हणावे, असुरांना…? तुम्हीच सांगा..! शिंदेंच्या बंडावरून दानवे संतापले
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवार साहेब म्हणाले हे खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकले नाही किंवा ऐकले असेल तर ते त्यांना अस्वस्थ करणारे होते. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मी असे सांगितले की : 1978 साली पवार साहेब वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि जनसंघासोबत सरकार तयार केले. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्याच सोबत निवडून आले होते. ते 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि आमच्या सोबत सरकार तयार केले. मग पवार साहेबांनी तयार केलेले सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कसे होऊ शकते? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“अशोक चव्हाण यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बघायचंय”
दरम्यान, मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो; इतिहास बदलत नाही. कोण जन्माला आले, कधी आले याच्यावर इतिहास बदलत नसतो. इतिहासात लिहून ठेवले आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. ते बाहेर पडले. आणि भाजपसोबत म्हणजे तेव्हाच्या जनसंघासोबत सरकार तयार केले. तेच मी सांगितले. असंही ते म्हणाले.
पवार साहेब म्हणाले हे खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकले नाही किंवा ऐकले असेल तर ते त्यांना अस्वस्थ करणारे होते. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला.
मी असे सांगितले की :
1978 साली पवार साहेब वसंतदादा पाटील… pic.twitter.com/b10Vd5X6q5— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार, शरद पवारांच्या पट्टशिष्याचा मुलगा BRS मध्ये
हेही वाचा…“मनात राग आहे, की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय”, आदित्य ठाकरे
हेही वाचा…“राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती”
हेही वाचा…“देशात स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात शक्तीशाली प्रधानमंत्री म्हणजे इंदिरा गांधी “, शरद पवार
हेही वाचा…“माझी श्रद्धा आता नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर”, आशिष देशमुखांचं विधान