पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजप विरोधी पक्षातील नेते, आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकतांना दिसत आहेत. तर काही राज्यांमध्ये ईडी, सीबीआयचा धाक दाखवून थेट प्रादेशिक पक्षात फुट पाडतांना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय
काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इडीने अटक केली आहे. त्यावरून संपुर्ण देशात आता भाजपविरोधात वातावरण तयार झालं आहे. यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरूंगात टाकतात. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. १०० टक्के निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आलीय. झारखंड झालं, दिल्ली झालं अशाच पद्धतीनं कारवाई होत आहे. उद्या देशभरात होईल असेही शरद पवार म्हणाले.
तर पुण्यातून असो अथवा माढ्यातून मी आता कधीच लोकसभा निवडणुक लढवणार नाही. असे आज शरद पवारांनी बारामतीत बोलतांना स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुक लढवावी अशी मागणी पुणे, माढा आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पण आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. आता निवडणूक लढणार नाही. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा..पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची ताकद मिळणार ; बीडचं मैदान महायुतीच मारणार ?
यातच माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाहीय. महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आमच्याकडे आणखी काही लोक येतील. असाही दावा शरद पवारांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात धंगेकर विरूध्द मोहोळ सामाना , लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची घोषणा
हेही वाचा..सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरे बारामतीत ; थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात ; 48 जागा लढविणार, ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हेही वाचा…“राज ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा अदृश्य शक्तीचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”