पुणे : इंडिया अगेंस्ट करपक्शन या संघटनेच्या पुढाकाराने देशातील नोंदणीकृत ५० राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनविकास आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवणार असून आज ३२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तसेच मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरायचे असेल तर आम्ही उमेदवारी देणार असल्याचेही आघाडीचे नेते हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा…रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम ; नाराजींची नाराजी भाजप दुर कशी करणार ?
भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी पुण्यात ‘ महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील ‘ भारतीय जनविकास आघाडी ‘चे पुरस्कृत संभाव्य उमेदवारांची कार्यशाळा आयजित करण्यात आली होती, त्या नंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आघाडीचे प्रमुख भाऊसाहेब बावने , राजेंद्र वनारसे, शिवाजीराव म्हस्के, अशोक जाधव धनगावकर, रेणुका पानगावकर, प्रा. रेखा पाटील, सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा…मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा ; राज ठाकरेंना किती जागा? हालचालींना वेग
जरांगे पाटील यांनाही पाठिंबा देऊन उमेदवारी देणार तसेच छगन भुजबळ ओबीसी साठी लढण्यास तयार असतील तर त्यांनाही मदत करणार असल्याचे सांगत हेमंत पाटील म्हणाले, प्रस्थापित राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत यामुळे जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून आम्ही जात आहोत. आम्ही कोणत्याही आजी – माजी आमदार, खासदार किँवा मंत्री यांना उमेदवारी देणार नाही. सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न, शेतकऱ्यांना मोफत वीज, बेरोजगारी कमी करणे आणि पायाभूत सुविधांची निर्मिती हे आमचे ध्येय आहे.
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील आमच्या आघाडीतील सर्व घटक पक्ष हे राज्यभर पसरलेले आहेत ज्यांची जिथे जास्त ताकद त्या पक्षाला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. उर्वरित १६ उमेदवार येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येतील असेही हेमंत पाटील यांनी सांगितले. भाऊसाहेब बावने म्हणाले, राज्यात तिसरी आघाडी म्हणून भारतीय जनविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. तसेच ही आघाडी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लढणार आहे. राजेंद्र वनारसे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुकीत आम्ही उतरत आहोत.
READ ALSO :
हेही वाचा…“राज ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा अदृश्य शक्तीचा प्रयत्न”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा..पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची ताकद मिळणार ; बीडचं मैदान महायुतीच मारणार ?
हेही वाचा…“पैलवान कधीच म्हातारा होत नसतो”, शरद पवारांचा उल्लेख करत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल