बीड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बीडची लोकसभा निवडणुक चांगलीच प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे या वंचितकडून निवडणुक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांच्यासह ज्योती मेटे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर याठिकाणी तिरंगी लढत अटळ आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला
लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा ज्योती मेटे यांनी याआधी बोलून दाखवली आहे. मध्यंतरी त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल. अशी चर्चा होत्या. यासाठी त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली. परंतु शरद पवारांनी बीडमधून धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ज्योती मेटे आता अपक्ष किंवा वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
यावर बोलतांना ज्योती मेटे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुक लढवण्याची माझी मानसिकता आहे. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत मी अंतिम निर्णय घेणार आहे. शरद पवार गटाने आपल्याला का नाकारलं? यावर त्या म्हणाल्या की, याबाबतचा अंदाज मी वर्तवण्यापेक्षा त्याच पक्षाने याचा खुलासा करण्याची गरज आहे. मी मात्र लोकसभा निवडणुक लढवणार आहे. याबाबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या बाजूला ज्योती मेटे यांना वंचितकडून उमेदवारी दिली तर याचा फटका दोन्ही नेत्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र मराठवाड्यात होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या भागात मराठा आऱक्षणाच्या मुद्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठा उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीडमध्ये ज्योती मेटे यांच्या सारखा मराठा उमेदवार प्रभावी ठरू शकतो.
READ ALSO :
हेही वाचा…“पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर”, फडणीसांचं कॉंग्रेसवर टिकास्र
हेही वाचा..“मुहुर्त ठरू तर द्या..”, खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचं सुचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा...जळगावात ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार , ३० माजी नगरसेवक फुटणार, राजकीय भुकंप अटळ
हेही वाचा…अन् वसंत मोरेंनी ससून रूग्णालयाला भेट दिला उंदिर पकडण्याचा पिंजरा, दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार