ठाणे : केंद्र सरकार पुरस्कृत आयुष्यमान भारत योजनेनिमित्ताने ठाण्यात संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली होती. याकार्यक्रमात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमात आपल्या भारत देशाचा तिरंगा उलटा दाखवण्यात आला आहे. याचे फोटो काही समाज माध्यमांवर देखील व्हायरल होत आहे. त्यावरून संपुर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी हल्लाबोल केलाय. कार्यक्रमात लावण्यात आलेल्या या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री कपील पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांचाही फोटो आहे.
हेही वाचा…अबब..! काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,२00 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद, मोदींची टिका
सर्वांना देशप्रेमाचे धडे देत फिरणारे भाजपवाले व खोके सरकारचे मंत्री मोदीभक्तीत इतके तल्लीन झालेत की राष्ट्रध्वज देखील आपण उलटा दाखवला आहे याचे भान त्यांना राहिलेले नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे खोके सरकारचे मंत्री या संतापजनक कृत्याबद्दल माफी मागणार का? असा सवाल यावेळी काॅंग्रेसने केला आहे. त्यावर आता भाजप आणि सरकारकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..नाशिकच्या शिरपेचात आणकी एक मानाचा तुरा, भारती पवारांना केंद्रात लागली आणखी लॉटरी, कायकर्त्यांमध्ये जल्लोष
दरम्यान, तिरंगा फडकवण्याचे काही नियम आहेत. त्यानुसार तिरंगा ध्वज हा लोकर, सूत,सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रूंदीचे प्रमाण ३ : २ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेऊन झेंडा फडकवू नये. मात्र कोल्हेर येथील कार्यक्रमात हिरवा रंग वर आणि केशरी रंग खाली असा झेंडा बॅनरवर लावण्यात आला आहे.
Shinde government’s chaotic administration, country’s tricolor in program reversed; Criticism of opponents
READ ALSO :
हेही वाचा…कोल्हापुरात सतेज पाटलांची ”फिल्डिंग” भाजपला जड जाणार; पाटलांनी जिल्ह्यात उभारलं कार्यकर्त्यांचं नवीन जाळं
हेही वाचा..“सरकारला पश्चाताप करावा लागेल, फडणवीसांना उघडं पाडू,” जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“पुणे शहर लोकसभेसाठी मनसे सक्षम नेतृत्व,” पुण्यात वसंत मोरेंची बॅनरबाजी, तिरंगी लढत होणार ?
हेही वाचा…“आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे”,प्रज्ञा साध्वींचा उल्लेख करत अजित पवार गटाचा फडणवीसांच्या भूमिकेला तीव्र विरोध
हेही वाचा…“मलिकांबद्दल अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी, उगीचच एक मिनिट, एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये”, कुणी डिवचलं?