कोल्हापूर : राज्यात सुरूवातीला शिवसेना अन् त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर कोल्हापुर लोकसभा मतदारसंघात मोठे राजकीय गणिते बदलली आहेत. विद्यमान खासदार संजय महाडिक शिंदे गटात गेल्याने याठिकाणी आता महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना बघायला मिळणार आहे.परंतु त्याआधी येथील राजकीय गणिते फार बदलली आहेत. ही जागा महायुतीत शिंदेंच्या ताब्यात असली तरी भाजपसोबत राष्ट्रवादीचा अजित पवार गट देखील दावा सांगण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे तर काॅंग्रेसकडूनही दावा सांगितला जात आहे. याचमुळे आता काॅंग्रेसचे नेते सतीश पाटील यांनी या जागेसाठी मोठी फिल्डिंग लावून ठेवली आहे.
हेही वाचा..नाशिकच्या शिरपेचात आणकी एक मानाचा तुरा, भारती पवारांना केंद्रात लागली आणखी लॉटरी, कायकर्त्यांमध्ये जल्लोष
सध्या या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफांकडे असून ते अजित पवारांच्या गटात आहेत. तर खासदार म्हणून संजय महाडिक शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. काॅंग्रेसकडून सतेज पाटील यांनी निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तर अधूनमधून भाजप देखील या लोकसभेची चाचपणी करतांना दिसत आहेत. तर अजित पवार गटासोबत असलेले जिल्ह्याध्यक्ष ए.वाय. पाटील गेल्याने शरद पवार गटाची जिल्ह्याध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेल्या व्ही.पी. पाटील यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर ठाकरे गटाकडून माजी आमदार संजयबाबा घाटगे इच्छूक असून त्यांचे शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरेंशी घनिष्ठ संबंध आहेत. ते हसन मुश्रीफांच्या जवळचे मानले जातात. परंतु ते महायुतीत गेल्याने मुश्रीफ त्यांना साथ देणार हे धुसरच आहे.
हेही वाचा…NIA ची महाराष्ट्रात तब्बल ४३ ठिकाणी छापेमारी, बॉम्बस्फोटातील आरोपींसह १५ जण अटकेत
शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटांने या लोकसभेवर आपली उमेदवारी पक्की केली असती तर सतेज पाटलांनी याठिकाणी मोठी ताकद निर्माण केली आहे. सतेज पाटलांनी काॅंग्रेसचे चार विधानसभेचे व दोन विधानपरिषदेचे आमदार निवडून आणत याठिकाणी नेतृत्वाची चुणूक हायकमांडला दाखविली आहे. गेल्या पाच- सहा वर्षांत त्यांनी जाणीवपुर्वक प्रत्येक तालुक्यात लक्ष देत कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. राजाराम कारखाना वगळता, गोकूळ, जिल्हा बॅंक, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. सहकारात संचालक पेरल्याने प्रत्येक तालुक्यात एक विशिष्ट गट त्यांनी कार्यरत केलाय. शिवाय बिद्रीच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी ओळखून नेतृत्व करण्याची संधी दिलीय.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव अन् चिन्हाबाबत सुनावणी संपली, आता निकालाची प्रतिक्षा, कुणाच्या बाजूने लागणार ?
आमदार सतेज पाटलांचा सात वर्षाच्या पालकमंत्री पदाचा अनुभव लक्षात घेतला तर त्यांनी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी उभी केलीय. कार्यकर्त्यांचे विशेष गट तयार केलेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हाच गट सत्ताधाऱ्यांना अवजड जाणार हे नक्कीच मानले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांच्या नेतृत्वाचा वरचष्मा राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून आहे
READ ALSO :
हेही वाचा..“सरकारला पश्चाताप करावा लागेल, फडणवीसांना उघडं पाडू,” जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“पुणे शहर लोकसभेसाठी मनसे सक्षम नेतृत्व,” पुण्यात वसंत मोरेंची बॅनरबाजी, तिरंगी लढत होणार ?
हेही वाचा…“आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे”,प्रज्ञा साध्वींचा उल्लेख करत अजित पवार गटाचा फडणवीसांच्या भूमिकेला तीव्र विरोध
हेही वाचा…“मलिकांबद्दल अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी, उगीचच एक मिनिट, एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये”, कुणी डिवचलं?
हेही वाचा…अबब..! काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,२00 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद, मोदींची टिका