रायगड : रायगडमधील खालापूर तालुक्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे यामध्ये १५ ते २० मुलांचाही समावेश आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या घटनेवर लक्ष्य ठेऊन आहेत.
हेही वाचा…अजित पवारांची बंद दाराआड चर्चा, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले, “राज्यात आता…”
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ठिकाणी शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार आहे. रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न् नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तशा सुचना दिल्या आहेत. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ५ लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. तसेच १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तुरडाळ, तेल, सारख देखील देण्यात येणार आहे. जोपर्यंत परिस्थिती पुर्व पदावर येत नाही तो पर्यंत हा पुरवठा सुरू राहणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची विधानसभेत एंट्री, सोमय्यांवर प्रश्न विचारले असता, म्हणाले की, “अशा…,”
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. स्थानिक प्रशासनाची तातडीची बैठक बोलवून स्थानिक नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेण्यात येत आहे. तर इर्शालगडाजवळ डोंगराजवळील एका गावावर काल रात्री दरड कोसळली. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली आहेत. आतापर्यंत या दरडीखालून 34 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे.
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरडग्रस्त इर्शाळगड गावाला भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून गाव ढिगऱ्याखाली.., मंत्रिमंडळातील त्रिमूर्ती लागली कामाला
हेही वाचा…माळीणची पुन्हा आवृत्ती, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
हेही वाचा…“सासू नाही तर दबंग मित्र म्हणून वाट्याला आलाय,” अजित दादांवर शहाजी बापूंचं मोठं विधान
हेही वाचा…पिता-पुत्र राजकारणात…! अजित पवार दिल्लीत सक्रिय, तर पार्थ आणि जय पवारांची राज्याच्या राजकारणात एंट्री
हेही वाचा…“तर त्याला ‘संतोष बांगर अन् मुख्यमंत्री’ जबाबदार,” अयोध्या पौळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी