मुंबई : बंडखोर आमदारांच्या कुटुंबियाची सुरक्षितता राज्य सरकारकडून काढून घेण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. असंही ते म्हणाले.
“अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, मी याआधीच म्हटलं होतं”; चंद्रकांत पाटील
दोन ते तीन दिवस झाले असून देखील बंडखोर आमदारांचं बंड काही थांबता थांबेना झालं आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहारांत शिवसेना आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफो़ड आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आज पुण्यात बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन
कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गद्दार असंही लिहण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं सांगितलं. पुण्यात तसेच इतर शहरात देखील बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली होती. त्यांचा सयंम आता सुटला असून शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
“बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, बंडखोर आमदारांना अजूनही दोन दिवसांचा अवधी आहे. यामधून जे जे आमदार महाराष्ट्रात येतील ते यातून सुटतील, आणि जे आमदार येणार नाहीत. त्यांच्यावर असंच करण्यात येईल, असा इशाराही देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दिला आहे. तसेच पुण्यात ही सुरूवात असून महाराष्ट्रातील सर्वच बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also:
- गायब सचिन जोशी कोण, त्यांचा बंडांशी काय संबंध? व्हायरल झालेल्या फोटोमुळे खळबळ
- “बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा
- बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
- “कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप
- भास्करराव जाधव शिवसेनेच्या विरोधात बंड करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले..;