मुंबई : गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी उच्च न्यायालयाने इडीला फटकारत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. यावरून केंद्रीय तपास यंत्रणा कशापद्धतीचे काम करीत आहे. या प्रकरणावरून आता जनतेला कळू लागलं आहे. संजय राऊत निर्दोष असताना देखील त्यांना 103 दिवसानंतर जामीन मंजूर झाला. याविरोधात इडीने उच्च न्यायालयात धाव घेतली, पण तिथे उलट इडीवर ताशेरे न्यायालयाने ओढले. यावर आता सामानातून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
दिपाली सय्यद यांच्याविरोधात सेनेचं पुण्यात आंदोलन..! शिंदे गटात गेल्या अन्..;
देशात कायद्याचे राज्य नाही. न्याययंत्रणेवर दबाव आहे व केंद्रीय यंत्रणा गुलाम बनल्या आहेत. संजय राऊत प्रकरणात हे उघड झाले. विशेष न्यायालयाने हे सर्व परखडपणे समोर आणले. मुंबई- महाराष्ट्रातील भाजपचे किमान 7 मंत्री, 15 आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स मनी लॉण्डिरिंग प्रकरणात आता जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर असल्याचं सामानामधून सांगण्यात आलं आहे. पण इडी स्वत : आरोपींची निवड करते हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते.
“शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले पण..;” अफजल खानच्या कबरीवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
विशेष न्यायालयाचे निर्भय न्यायमुर्ती एम.जी देशपांडे यांचे निकालपत्र ऐतिहासिक व मार्गदर्शक आहे. न्या देशपांडे यांचे निकालपत्र व निरिक्षणे तेजस्वी प्रकाश किरणांसारखी आहेत. सध्याच्या न्यायव्यवस्थेतील अंधकार दुर करणाऱ्या निकालांचे स्वागत देशभरात झाले ते यामुळेच. तुरूंगात खितपत पडलेल्या अनेकांना यामुळे प्रकाश दिसेल अशी आशा करूया. असा संदर्भ देखील जोडण्यात आला आहे.
“केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर..”; ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, सध्याचे केंद्रीय सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. यावर मुंबईतील विशेष न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळ्याचा ठपका ठेऊन शिवसेना नेते संजय राऊत यांनी इडीने केलेली अटक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी देशपांडे यांनी बेकायदेशीर ठरवली आहे.
Read also
- “संजय राऊत विद्वान आहेत, त्यांना तुरूंगवास भोगावा लागला, वाईट वाटतं..;” दिपक केसरकर
- राहुल गांधींना राष्ट्रवादीची साथ..! भारत जोडो यात्रेत सुळे, जयंत पाटील अन् आव्हांडाची हजेरी
- “तर मग जितेंद्र आव्हाडांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं”; मनसेने डिवचलं
- “हा माझ्या भावावर अन्याय आहे..;” सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण
- “अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने महाराजांनी बांधली”; जितेंद्र आव्हाड