मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर आघाडीतील नेत्यांची चांगलाच समाचार घेतलं होतं. त्यानंतर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टिका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर आता दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..
चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरून सुप्रिया सुळे यांना मसणात जा. अशा पद्धतीच्या भाषा वापरली होती. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना मसणात आणि हिमालयात जाऊन राजकीय सन्यांस घ्या, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून त्यांच्याविरोधआत तक्रार करण्याची मागणी होत आहे. त्यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
मुख्यमंत्री पदावर पातळी सोडुन भाजपच्या नेत्यांनी टिका केली तर त्यांना पंतप्रधानांची आठवण करून दिली जाईल. या प्रक्रियेत भाजपच्या लिंबु टिंबुना वाईट वाटल तरी त्यांच्या तक्रारींना शिवसेना भिक घालत नाही. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरणीय आहेत . त्यापेक्षा जास्त आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदरणीय आहेत. शेवट शिवसेना करणार. असं म्हणत त्यांनी भाजपला इशाराही दिला आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
दरम्यान, झालेल्या प्रकाराबाबत चंद्रकांत पाटील यांनी महिला आयोगाला एक पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी. ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिना खासदार आहेत. मला सुप्रियाताईबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही. असंही म्हटलं आहे
Read also:
- आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
- भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
- भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
- “निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
- “काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”