मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
“मी बोललो, पण काही चुकीचं बोललो नाही; माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे”
“आपल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले आहे; महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. तिथं आपल्याला सत्ता आणायची आहे आणि मी त्यांना तसे आश्वासन देऊन परतलो आहे; पण हे मला सुखानं जगू देणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, गृहखातंदेखील त्यांच्याकडे आहे आणि ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. त्यांना जाणीव होतीये की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. त्यामुळे, मी कुठं सभा घेतली, दौरे केले याची सगळी माहिती घेतली जाते, याचा तिन्ही पदांना देण्याचा आदेश आहे”, असं गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
दरम्यान, नाना पटोलेंच्या या वक्तव्याने उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यातच आता शिवसेनेनंही पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी, “पटोलेंना जे काही बोलायचं असेल, ते त्यांनी खासगीत बोलावे, असे चव्हाट्यावर बोलू नये,” असा मोलाचा सल्ला दिला आहे. तसेच, त्यांनी या विधानावर आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार नाना पटोलेंवर नाराज, संतापून केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाले…
“पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत, त्यामुळे त्यांना आपण काय बोलतोय याचं भान असलं पाहिजे. त्यांना काही अडचण असेल तर, त्यांनी ती मुख्यमंत्री किंवा बाळासाहेब थोरात यांच्याकडे सांगितली पाहिजे, पण असं वक्तव्य करणं योग्य नाही. महाविकास आघाडीतल्या प्रत्येकाने आपल्या विधानाने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी आणि विचार केला पाहिजे, आता याबाबतीत पुढचा निर्णय त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री घेतील,” असं त्यांनी सांगितलं आहे.
“ठाकरे सरकारमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे आता बाहेर येऊ लागलंय”
दुसरीकडे, नाराज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, “नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे. पटोले हे नेते नाहीत किंवा मंत्रीही नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांची भूमिका महाविकास विकास आघडीला कमकुवत करण्याची आणि अडचणीत आणणारी आहे. त्यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी बोलून दाखवली आहे.
“पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेने शिवसेना-राष्ट्रवादीला अन्नपाणी नको झालंय”
दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नाना पटोलेंनी, आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला आहे आणि याबाबत मनगढत कहाण्या रचून महाविकास आघडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव सुरू आहे. पण तो कधीही यशस्वी होणार नाही,” असा दावा करत, यु टर्न घेतला आहे.
Read Also :
- पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ; आत्मसन्मान राखण्यासाठी तरी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? भाजपचा सवाल
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
- पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
- मोदी सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत; ६ ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!