पुणे : येत्या 3 मे रोजी ईद असल्याने आम्हाला त्यात विष कालवायचं नाही, मात्र त्यानंतर 4 तारखेपासून आम्ही कुणाचंही ऐकणार नाही. मशिदीवर ज्या ज्या ठिकाणी अजाण सुरू होईल. त्यावेळी मोठ्या आवाजात त्याठिकाणी हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत दिला. त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर देखील कडाडून प्रहार केला. तसेच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का? असा सवाल करीत त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टिका होत आहे.
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी याबाबत राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, खोट पण रेटून कसं बोलावं हे राज ठाकरे यांच्याकडून शिकावं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल. इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणार भाषण कालच राज ठाकरेंचं होत. असा घणाघात त्यांनी केला आहे. हे सर्वांना माहीत आहे रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध महात्मा जोतिबा फुलेंनी लावला.
‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
शिवरायांच्या मृत्यूनंतर लगेच त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी समाधीचे बांधकाम केलेले आहे. आणि इतिहासाच्या काळाच्या पडद्याआड गेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 1869ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली. तीचा जीर्णोद्धार केला. असंही ते म्हणाले.
“विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
दरम्यान, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी राजांचे जेवढी स्थळ आहेत त्या स्थळाचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले. त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, पन्हाळा किल्ला, शिवनेरी किल्ला आणि रायगड यांचादेखील समावेश होता. पण टिळकांनी मध्येच खोडा घातला आणि शिवस्मारक रायगडावरती करायचं यासाठी प्रचंड निधी गोळा केला. त्या काळामध्ये 80 90 हजार रुपये टिळकांनी गोळा केले. त्यातील एकही रुपया शिवरायांच्या समाधी स्थळासाठी खर्च केला नाही. त्यामध्ये त्यांनी गफला केला म्हणजे शिवरायांच्या नावावरती पैसे खाणारे हे टिळक त्यांनी रायगडावर एक सफह दगडही बसवला नाही, त्या टिळकांनी शिवसमाधीच बांधकाम केलं अस धादांत खोट राज ठाकरे बोलत आहेत. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
Read also:
- राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका
- “संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
- प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!
- “महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका
- “नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र