मुंबई : पार्थ पवार , श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अट्टल गुन्हेगारांसोबत फोटो पुढे आल्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासबोत पुण्यातील अट्टल गुन्हेगार नीलेश घायवळ सोबतचा फोटो समोर आला आहे. खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट केला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. राज्यात गुंडाराज असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असल्याचे म्हणत गुंड लोकशाहीचा आणि विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी पाळले आहे का असा सवाल देखील राऊतांनी केला. त्यावर आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…बाळा नांदगावकरांनी भेट म्हणून राज ठाकरेंना दिली ‘बाबरी मशिदीची वीट’, राज ठाकरे म्हणाले…
चिंचवड, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना सरकारमधील लोकांनी बोलावले होते. निवडणूक काळात गुंडांना पॅरोलवर सोडले. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या कोणी आणि कोणत्या हॉटेलवर भेटी घेतल्या याची माहिती असून यथावकाश हे बाहेर काढले जाईल. राजकारणासाठी गुंडाचा वापर केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुंड सक्रिय केले जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी सरकारवर केला.
हेही वाचा…“पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली, महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा”
दरम्यान, साधनशुचितेचा दावा करणाऱ्या भाजपचा आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. मारणारा आणि ज्याच्यावर गोळी मारली दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. जमिनी,संपत्तीच्या वादातून हे प्रकार होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे हे वर्षा या शासकीय बंगल्यावर पुण्यातील गुंडाला वाढदिवसानिमित्त भेटतात. वर्षा बंगल्यावर कोणीही येऊ शकत नाही. प्रशासनाकडून तपासणी करून आतमध्ये सोडले जाते असे असताना दिवसाढवळ्या बंगल्यावर गुंड जातात महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आले आहे. सरकारच्या आशीर्वादाने राज्यात गुंडांगर्दी सुरू असल्याची टिका ही त्यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटलांचा १० फेब्रुवारीपासून पुन्हा एल्गार..! सरकारला दिला पुन्हा हा इशारा
हेही वाचा…दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेचे संकेत
हेही वाचा…*“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, आयत्या प्रकल्पांवर उबाठा,” भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटवॉर*
हेही वाचा…“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेला शरद पवार गटाचा विरोध”, म्हणाले….
हेही वाचा…“जमीन विकून आलेला पैसा अन् पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही”