सातारा : पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. २०१९ साली सोडून गेलेल्या लोकांच्या बाबतीत जे झालं तेच २०२४ साली त्यांच्या बाबतीत होणार आहे. ज्या लोकांना पवार साहेबांनी लाल दिवे दिले त्या लोकांनी नागपूरचे मांडलीकत्व पत्करले. असं म्हणत शरद पवार गटाचे युवा नेते महेबुब शेख यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. सातारा येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सातारा येथील कोरेगाव येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“इच्छूक उमेदवारांचा पुण्यात अध्यात्मिक कार्यक्रमांवर भर”, पुणे लोकसभेसाठी स्पर्धा वाढली
बाळू शिंदे साहेब असतील किंवा बाळासाहेब पाटील साहेब असतील हे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आता पक्ष चोरायची नवी सिस्टीम सुरू झाली आहे, त्यामुळे आमच्या सारख्या युवकाला असे वाटते की राजकारण करायचे की नाही? ज्या लोकांना पवार साहेबांनी मोठे केले ते आपली संस्कृती विसरायला लागले आहेत. साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे याची वाट हे लोक बघायला लागले आहेत, हे शब्द ऐकले की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख होते असं म्हणत आपले राजकारण हे कोणत्या दिशेला जात आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा…“नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात”, अजित पवार अन् आव्हाडांमध्ये वाकृयुद्ध
तसेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की शंभर वर्षे जरी झाली तरी वडिलांचे छत्र आपल्याला हवे हवेसे वाटते, पण भारतीय जनता पक्षाच्या विकृतीत गेलेले लोक आज पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत. भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट वाचण्यात ते एवढे बेईमान होऊन गेलेत की ज्या माणसाने आपल्याला निर्माण केले आहे त्या माणसाबद्दल त्यांना विसर पडला असल्याचा घणाघात शेख यांनी अजित पवारांवर चढवला.
पंतप्रधान हे फक्त गुजरात राज्याचे आहेत का? गुजरातला सोन्याची लंका करा, आमचे काही म्हणणे नाही. पण आमच्या महाराष्ट्रातल्या युवकाच्या हक्काचे रोजगार तुम्ही का पळवत आहात? शासकीय रिक्त पदे हे लोक भरत नाहीत. या गोष्टीवर आपले लक्ष जाऊ नये म्हणून हे लोक दोन धर्मांमध्ये भांडण लावतात, मराठा व ओबीसी समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम या सरकारने ठरवून सुरू केले आहे. छगन भुजबळ यांना जी काही ओबीसींची भूमिका मांडायची आहे त्यांनी ती कॅबिनेटच्या बैठकीत मांडावी. गावागावात जाऊन आपल्याला शरद पवार साहेब यांचे विचार सांगावे लागणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…बाळा नांदगावकरांनी भेट म्हणून राज ठाकरेंना दिली ‘बाबरी मशिदीची वीट’, राज ठाकरे म्हणाले…
हेही वाचा…“पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली, महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा”
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी मनसेचा पुढचा उमेदवार कोण ?” शर्मिला ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत
हेही वाचा…मोठी बातमी….! कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी अजित पवारांची आख्खी फॅमिली लागली कामाला
हेही वाचा…“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल..,” वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल