पुणे : ऐन नवरात्रौत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी मोदी सरकारने गृहिणींच्या चिंतेत आणखी भर घालण्याचं काम केलंय. एकीकडे एलपीजी गॅस सिलेंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलेंडर वापरावर मर्यादा आणायची, यातून केंद्र सरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून येतं. केंद्राच्या नव्या नियमानुसार उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी नसलेल्या ग्राहकाला वर्षभरात केवळ १५ आणि अनुदानित असलेल्या ग्राहकाला १२ तर दोघांसाठीही महिन्याचा कोटा २ सिलेंडरचा करून मोदी सरकारने प्रत्येक गृहिणीच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
“अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ही बातमी वाचण्यात आली व अक्षरशः धक्काच बसला. तर दुसरीकडे एखाद्या ग्राहकाला जर गॅस सिलेंडरची आवश्यकता असल्यास त्यासाठी गॅस सिलेंडर कंपनीच्या अधिका-यांची परवानगी घ्यावी लागेल तसेच त्याचा पुरावा देऊन, त्यासाठी कागदपत्र सादर करून त्यानंतरच त्या ग्राहकाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल. एकीकडे ‘ई-गव्हर्नन्सचा’ गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे अतिरिक्त गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पुन्हा नागरिकांना कागदपत्रं घेऊन खटाटोप करायला लावायचा यातून केंद्र सरकारची कार्यपध्दती किती कुचकामी आहे हेच पाहायला मिळतं.
महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन समस्त महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली आहे. संसाराचा रहाटगाडा चालवायचा कसा असा प्रश्न आता माझ्यासह देशातील अनेक गृहिणींना पडलाय. देशात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव साजरे केले जातात. या सणावळीत विविध पक्वान्न, खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे घराघरात या काळात गॅस सिलेंडरची सर्वाधिक आवश्यकता असते. पण केंद्राच्या केवळ १५ सिलेंडरच घेण्याच्या नियमामुळे देशवासियांना मर्यादेमध्ये गॅस सिलेंडर वापरावा लागणार असून आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणारेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठरलं तर..! शिवसेना नेमकी कुणाची? निवडणुक आयोगाने केलं स्पष्ट
दरम्यान, केवळ सण उत्सवच नव्हे तर अनेक महिला या घरगुती डबे पुरवण्याचे काम करतात किंवा अनेक विद्यार्थी पेईंग गेस्ट किंवा समूहाने राहतात, अशांसाठी गॅस सिलेंडरची जास्त आवश्यकता असते. परंतु या निर्णयाने महिला, विद्यार्थी व पेईंग गेस्टसारख्या सर्वांनाच चिंतेत टाकण्याचं काम मोदी सरकारने केलंय. देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजप सरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर, सण उत्सव साजरे करण्यावर व एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातलं आहे. एक गृहिणी म्हणून मी या निर्णयाचा जाहीर निषेध करते. अशाही त्या म्हणाल्या.
Read also
- “बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका”; चंद्रकांत खैरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “शरद पवारांचं नाव अन् काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल?”
- “शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
- “शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल
- “मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? हे मला माहितीय”; उदय सामंत