मुंबई : निवडणुकीमध्ये फडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेलं नाही. कारण शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला प्रंचड प्रेम दिलंच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. असं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठरलं तर..! शिवसेना नेमकी कुणाची? निवडणुक आयोगाने केलं स्पष्ट
तो काळ गेला आहे. शरद पवारांचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत: च कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे. पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची झाली असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मी बारामतीत जेव्हा गेलो, तेव्हा एवढंच म्हटलं की जर घड्याळ बंद पाडायचं असेल, तर बारामतीतून पाडा. कार्यकर्त्यांना मी आवाहन केलं. त्यानंतर सुप्रिया सुळेंना आता रोज 25 गावं फिरावी लागत आहेत. बारामती या एकाच मतदारसंघात सरकार पोहोचलं आहे, बाकी पाचही विधानसभेत कोरी पाटी आहे. त्यामुळे तिथे प्रचंड नाराजी आहे. मला विश्वास आहे की, 45 हुन अधिक लोकसभा आम्ही जिंकणार आहोत. त्यात बारामती क्रमांक एकवर असेल. तिथे कोणताही स्टार उमेदवार देण्याची गरज नाही, तिथे साधा उमेदवारही जिंकेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
“शरद पवारांनी फक्त एक महाराष्ट्राचा दौरा केल्यावर लगेच ते सत्तेवर बसतात”; सुप्रिया सुळे
दरम्यान, मी ज्यावेळेस परदेशात पॅन्ट घालून रस्त्याने चालते त्यावेळेस कोणी बघत पण नाही. ते म्हणतात कोणीतरी भारतीय मुलगी चालली आहे रस्त्याने. मात्र मी जेव्हा साडी नेसून परदेशात उतरते त्यावेळी मला विचारतात. इंडियन,? व्हेरी ब्युटीफुल साडी..! हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की, शरद पवार विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गमंत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
- “शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल
- “मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? हे मला माहितीय”; उदय सामंत
- “अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं
- महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत