दौंड : पुण्यात स्वप्नील लोणकर या MPSC करणाऱ्या तरुणाने, सरकारच्या नाकर्तेपणामुळे, वेळकाढू धोरणामुळे आणि गलथान कारभारामुळे आत्महत्या केली, अशी टीका भाजपकडून ठाकरे सरकारवर केली जात आहे.
“शिवसेनेला वन खात्याची गरज नाही, कारण सेनेत आता वाघच शिल्लक नाहीत!”
दरम्यान, आज स्वप्नीलच्या घरी जाऊन, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी, त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच, बहिणीच्या लग्नाची जबाबदरी उचलून, कुटुंबियांवरचा दुःखाचा डोंगर आणि भार कमी करण्याचा प्रयत्न केला. यांनतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
“अजित पवार यांना स्वप्निलचे काही देणेघेणे नाही, त्यांना फक्त त्यांच्या मुलाची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी, एखादा कारखाना मिळतो का, याचीच फक्त त्यांना चिंता आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. पुण्यात, MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने, स्वप्नीलने आत्महत्या केली. मात्र यांनतर ना मुख्यमंत्र्यांनी ना उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरच्यांची चौकशी केली,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.
बीडमध्ये भाजपला धक्का; प्रीतम मुंडेला डावलल्यामुळे तब्बल १४ जणांनी दिला राजीनामा
तसेच, “स्वप्नीलच्या मृत्यूला सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नीलच्या घरच्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी विधानसभा अधिवेशनावेळी सभागृहात केली होती, त्याचा सरकारने विचार करावा,” असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल हेदेखील उपस्थित होते.
Read Also :
- पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते सेनाभवनावर धडकणार? असंख्य शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त
- “‘बारामतीत कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग, पुढे जायचे असेल तर वेगळे प्लॅनिंग करावे लागेल”
- उदय सामंत म्हणाले, “संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार”
- “केंद्राचे तिन्ही कृषी कायदे, ठाकरे सरकारने जसेच्या तसे लागू करावेत”
- सुप्रिया सुळेंनी उचलली स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी!