लोणावळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत काल, लोणावळ्यात काँग्रेस कार्यक्रर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.
उदय सामंत म्हणाले, “संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार”
यावेळी, प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी, ”बारामतीत कॉंग्रेसला मानणारा वर्ग आहे. तिथे मला वेगळे प्लॅनिंग करावे लागेल. तिथे होणाऱ्या व्यवस्थेच्या अंतर्गत होणारा अत्याचार, आणि त्या विरोधात जो उद्रेक आहे, त्याची मला माहिती आहे. परंतु, आपल्याला पुढे जायचे असेल, तर शत्रूला घरातच जाऊन मारले पाहिजे,” असा खोचक टोला त्यांनी राष्ट्रवादीला आणि उपमुख्यमंत्र्यांना नाव न घेता लगावला आहे.
“केंद्राचे तिन्ही कृषी कायदे, ठाकरे सरकारने जसेच्या तसे लागू करावेत”
तसेच, “मोठ्या जहाजांना बुडण्याची लवकर भीती असते. लहान होड्या इकडून-तिकडे कशाही लवकर निघून जातात. माझा इशारा तुम्हाला समजतो. मी पुण्याच्या दैाऱ्याला आलो, तर तिकडे मोठ्या जहाजांना त्रास होतो,” असे म्हणा, “पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे बारामतीचे, मात्र कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या ते कामाला येत नाहीत. पालकमंत्री हा जो त्रास देतात, त्या त्रासालाच तुम्ही आपली ताकद बनवा,” असा उपदेश त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.
“मी ईडीला भीक घालत नाही”, भास्कर जाधवांनी फोडली डरकाळी
त्यांनी परत एकदा, ”काँग्रेस स्वबळावर लढणार, मी अनेकदा बोललो आहे. मी आता माघार घेणार नाही. या स्वबळाच्या लढाईला आपण कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या शिवसैनिकांना हेच सांगितलं आहे, पण सगळ्यांना मीच दिसतो,” असं म्हणत त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला.
Read Also :
- सुप्रिया सुळेंनी उचलली स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी!
- भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
- जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर, नाना पटोलेंचा आक्षेप; दाखल केलेल्या याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
- “…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”