मुंबई : राज्यात आगामी काही काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपसोबत शिंदे आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी राज्यात हिंदुत्वाचा जोरदार प्रचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा राज्यात हिंदुत्वाचा कार्ड वापरण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा…उद्याच होणार राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार! फडणवीसांच्या दिल्लीवारीत यादीला हिरवा कंदील?
हिंदुत्वाचा प्रचार केल्याने २०१७ साली भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करता आली. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपने हिंदुत्वाचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्याला त्याचा मोठा राजकीय फायदा झाला. यातच आता महाराष्ट्रात देखील २०२४ साली विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या राज्यात देखील भाजप हिंदुत्वाचा कार्ड वापरण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार आमच्या संपर्कात, निवडणुकीआधी….” भाजप मंत्र्यांचा मोठा दावा
राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपच्या नेत्याने आक्रमक भूमिका घ्यावी, तसेच हिंदुत्वाचं महत्त लोकांना पटवून सांगण्याचे आदेश देशातील केंद्रीय मंत्र्यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना दिले आहेत. यातच काही दिवसात शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा सोहळा देखील धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी ही जबाबदारी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, मंगल प्रभात लोढा, नितेश राणे, राम कदम, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्याकडे देण्यात आली आहे.
हेही वाचा…“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”, नोटबंदीवरून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात
दरम्यान, मोदी सरकारचे काम आणि हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी भाजपच्या सर्व नेत्यांना प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार म्हणतात, “चार दिवस सासूचे, चार सुनेचे दिवस असतात”
हेही वाचा…काॅंग्रेसचा तगडा नेता, फडणवीसांची भेट, भाजपमध्ये जाणार का? दिले उत्तर, म्हणाले…
हेही वाचा…“द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं”, राहुल गांधी
हेही वाचा…“आदुबाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदे साहेब…”शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…मुनगंटीवारांनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्विकारलं, आता मोठा राजकीय धमाका होणार ?