नागपुर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठं बळ प्राप्त झालं आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचंही ठरवलं आहे. यातच शरद पवारांच्या निवासस्थानी यासंदर्भात एक बैठकही पार पडली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत एक मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“आर्यनचा आंतरात्मा .., प्लीज.. मी तुम्हाला बाप म्हणून.. “, आर्यन खानसाठी शाहरूख हातापाया पडला, वाचा सविस्तर…
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील निवडणुकीचं चित्र असणार असल्याचा दावा आता केला जात आहे. त्यावर बोलतांना, असा दावा केल्यानंतर कार्यकर्ते टिकतील. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काॅंग्रेस, आणि शिवेसेनेतील खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना अजूनपर्यंत आम्ही थांबवलं आहे. कारण त्यांचं सदस्यसत्व रद्द होऊ शकतं, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.
हेही वाचा…“एवढ्या मोठ्या कलाकाराला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं”,शिरसाठ यांनी सुषमा अंधारेंना डिवचलं
त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही जोरदार टोला हाणला आहे. आगामी काळात म्हणजे २०२४ ला निवडणुका होणारच आहे. त्यामुळे निवडणका आता घ्या, उद्या घ्या. असा प्रश्न निर्माण होत नाही. शिल्लक सेनेतील जेवढे शिल्लक आमदार आहेत. त्यांनी आधी राजीनामा द्यावा, तिथे अगोदर निवडणुका घेऊन ट्रायल घेऊ. हिमंत असेल तर अगोदर वरळीत अगोदर आपण टेस्ट करू.
READ ALSO :
हेही वाचा…“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”, नोटबंदीवरून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात
हेही वाचा…“अंधेरी रात में गया, और अंधेरी रात में वापस आया,” फडणवीसांची ‘दिल्ली’ वारी’ चर्चेत ?
हेही वाचा…काॅंग्रेसचा नागपुरचा ‘वजीर’ भाजपमध्ये जाणार ? फडणवीसांनीच लावली फिल्डिंग , एकेकाळी त्यांनाच दिली होती टक्कर
हेही वाचा…“कर्नाटक हल्ल्याचा इतका राग? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट”, नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा मोदींना टोला
हेही वाचा…“मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही”