नागपुर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याने शिंदेंचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यात शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे.
हेही वाचा…वानखेडेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा, तपासात आली मोठी ‘ही’ माहिती
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुर दौरा आयोजित करण्यात आला होता. दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस रात्री शुक्रवारी तातडीने दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत गेल्यानंतर फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून ते पुन्हा नागपुरात परतले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्वासोबत चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत दिले जात आहे. पुण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत देखील फडणवीसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसचा नागपुरचा ‘वजीर’ भाजपमध्ये जाणार ? फडणवीसांनीच लावली फिल्डिंग , एकेकाळी त्यांनाच दिली होती टक्कर
हेही वाचा…“कर्नाटक हल्ल्याचा इतका राग? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट”, नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा मोदींना टोला
हेही वाचा…“मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही”
हेही वाचा…“आर्यनचा आंतरात्मा .., प्लीज.. मी तुम्हाला बाप म्हणून.. “, आर्यन खानसाठी शाहरूख हातापाया पडला, वाचा सविस्तर…
हेही वाचा…“एवढ्या मोठ्या कलाकाराला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं”,शिरसाठ यांनी सुषमा अंधारेंना डिवचलं