मुंंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडद्यामागे ठेऊन फक्त मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने शिवसेनेत फुट पाडल्याची टिका होतांना दिसत आहेत. तसेच गेल्या २५ वर्षापासून सेनेच्या सत्तेत असलेली मुंबई ताब्यात असून ती घेण्यासाठी भाजप तयारी करीत आहे. यावरून शिवसेना उबाठा आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
भाजपच्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. मात्र ते, स्वत: वकील आहेत त्यांनी वकीलीही केली आहे. गद्दारांची प्रत्येक गोष्ट न्यायालयाने उडवून लावली आहे. एकनाथ शिंदे यांची निवडडही बेकायदेशीर आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. तसेच मोदी शहांच्या शंहाच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना कधी संपणार नाही. असा घणाघात राऊतांनी भाजपवर केला आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
दरम्यान, कादगावर निकाल लागत नाही तर जनता देईल. सध्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे निवडणुका घ्या मग बघा. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. येत्या सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यामध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि सरकारचाही निकाल लागेल अशा शब्दात राऊतांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आर्यनचा आंतरात्मा .., प्लीज.. मी तुम्हाला बाप म्हणून.. “, आर्यन खानसाठी शाहरूख हातापाया पडला, वाचा सविस्तर…
हेही वाचा…“एवढ्या मोठ्या कलाकाराला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं”,शिरसाठ यांनी सुषमा अंधारेंना डिवचलं
हेही वाचा…वानखेडेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा, तपासात आली मोठी ‘ही’ माहिती
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी