नागपुर : काॅंग्रेसमधील निलंबित काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे काॅंग्रेसवर नाराज असलेले देशमुख पुन्हा भाजपमध्ये परतणार का ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यावर आता आशिष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”, नोटबंदीवरून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उमरेड दौऱ्यावर आले. या दौऱ्यावर आले असता त्यांनी काॅंग्रेसमधून निलंबित असलेले आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यावर मी काॅंग्रेससोबतच राहणार आहे. अन् ही एक सदिच्छा भेट होती. असं आशिष देशमुख यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“अंधेरी रात में गया, और अंधेरी रात में वापस आया,” फडणवीसांची ‘दिल्ली’ वारी’ चर्चेत ?
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आशिष देशमुख यांच्यात अलिकडेच वाद झाला. त्यानंतर आशिष देशमुख यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावरही टिका केली. याचाच परिणाम म्हणून आशिष देशमुख यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आशिष देशमुखांनी निवडणुक लढविणार असल्याचं बोलून दाखवलं. त्यातच आज भाजपच्या नेत्यांनी आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं”, राहुल गांधी
हेही वाचा…“आदुबाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदे साहेब…”शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…मुनगंटीवारांनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्विकारलं, आता मोठा राजकीय धमाका होणार ?
हेही वाचा…उद्याच होणार राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार! फडणवीसांच्या दिल्लीवारीत यादीला हिरवा कंदील?
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार आमच्या संपर्कात, निवडणुकीआधी….” भाजप मंत्र्यांचा मोठा दावा