मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. एका गटाने आरोप केले की लगेचच त्यावर दुसरा गट प्रत्युत्तर देत आहेत. यामुळे एकेकाळचे असणारे सहकारी आता राजकीय वैरी होतांना संपुर्ण महाराष्ट्र पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्तेत सामील होण्याच्या आधी आता देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करणार असल्याचे म्हटले होतं. त्यावर शरद पवार गटाने पुरावे आम्ही देतो, परंतु तुम्ही धनंजय मुंडेंवर कारवाई करा ? अशी मागणी शरद पवार गटाने केलीय.
हेही वाचा…“प्रभू श्रीरामांची ‘ती’ संयमी योद्धा ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसतेय,”
शरद पवार गटाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आमचे एक काळचे सहकारी धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना प्रश्न केला होता की, त्या २२ लोकांची चौकशी कधी होणार ? त्यांची चौकशी करा, त्याचे सबळ पुरावे हे माझ्याकडे आहेत, असे जाहीर सभेत आव्हान केले होते आणि सबळ पुरावे मी देऊ शकलो नाही, तर राज्याच्या कोणत्याही चौकात मी फाशी घ्यायला तयार आहे. धनंजय मुंडे तेव्हा खोटं बोलले की खरं बोलले हा प्रश्न इथे उपस्थित होतो. आता त्या २२ मंत्र्यांची ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि केंद्र सरकार हे चौकशी करणार का ? असा सवालही विकास लवांडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा…“घाबरू नका, आजही बाप माणूस माझ्यापाठीमागे ढाल बनून उभा आहे”, Ed च्या चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
भोपाळच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो आरोप केला तो खरा होता की खोटा होता ? याचा निकाल लागला पाहिजे. तो जर खोटा असेल, तर पंतप्रधानांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि जर खरा असेल तर ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सतर्फे चौकशी ही झालीच पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली.
तर काल मोहन भागवत अयोध्येत एक वाक्य बोलले की, आतापर्यंत काय राज्यामध्ये ९ वर्ष राम राज्य आलेले नाही, पण यापुढे तरी रामराज्य यावे अशी मागणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित असताना मोहन भागवत यांनी केली. विरोधी पक्ष संपवायचा. लोकशाही ठेवायची नाही. सगळ्या तपास यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या आणि एका बाजूला मात्र विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की, आम्ही सर्व लोकशाही पाळत आहोत हे सर्व मन की बात करून जे काही सांगितले जात आहे की, आमच्या शिवाय पर्याय नाही हे धाधांत खोटे आहे, या देशात प्रत्येक वेळी पर्याय निर्माण झालेले आहे. भारत हा वांज नाही, इथे अनेक लोक विद्वान आहेत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांच्या विरोधात निवडणुक लढविली, आता त्यांनाच उमेदवारी देण्याचा भाजपचा नवा डाव”
हेही वाचा…उल्हास पाटिल सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत, माजी खासदार उल्हास पाटलांची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले..
हेही वाचा…“पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी निवडणुकीचे कागदपत्र कपाटातून गायब”, शरद पवार गटाचा मोठा आरोप
हेही वाचा…नितेश राणेंच चिथावणीखोर ट्विट अन् मीरा रोडवर वाढवला पोलिसांचा मोठा फौजफाटा
हेही वाचा…“30 वर्ष भाजप बरोबर राहून निर्लज्ज झालो नाही तर काँग्रेसबरोबर राहून काय काँग्रेस होणार”? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला