मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याआधी मराठा आरक्षणाच्या मसुद्याला कॅबिनेटने मंजुरी दिली. यानुसार आता मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाला मनोज जरांगे पाटलांनी विरोध केला असून त्यांनी सगेसोयऱ्यांची मागणी लावून धरली आहे. यातच मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा….कॉंग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपच्या वाटेवर ? 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य, जिंकण्यासाठी काहीपण..!
शिवसेना पक्ष फुटीनंतर ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करतांना दिसत आहेत. परंतु मराठा आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्या निर्घृणपणे निर्दयीपणाने डोकी फोडली ती आवश्यकता नव्हती. शांतपणे हा विषय सोडवता आला असता. मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिले. मराठा समाजातील बांधवांना कुठे नोकरी देणार सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास कोर्टात खेचणार, ओबीसी नेते आक्रमक, ” राजकारण पुन्हा तापणार
दरम्यान, मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर झाले याचा अर्थ असा आहे की कायद्याचे सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी आशा आहे. तशी आमची सर्वांची प्रार्थना आहे. सभागृहात याबाबत समजून सांगण्याची गरज नव्हती. कारण सभागृहात दोन्ही वेळेला एकमताने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”, अन् म्हणे मंत्री, नारायण राणेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध का ? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!” शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं
हेही वाचा…मोठी बातमी….! मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात नेमकं काय म्हणाले ?
हेही वाचा…जागावाटपाबाबत आघाडीची बैठक, ‘त्या’ १४ ते १६ जागांबाबतचा तिढा सुटणार का ?