मुंबई : राज्यातली दुसरी लाट ओसरली आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आधीच योग्य त्या उपाययोजना करत आहे आणि पावलं उचलत आहे. यातच आज मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, राज्याच्या दृष्टीने महत्वाची माहिती सांगितली आहे.
“तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ”, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चिमटे
“राज्यात आता कुठेही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नसून, प्रत्येक जिल्ह्यांतून १०० नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात २१ रुग्ण आढळले होते, पण आता नवीन रुग्ण आढळले नाहीयेत. त्यामुळे, राज्य सरकारच्या लढ्याला यश आले आहे,” अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे.
त्याचवेळी दुसरीकडे, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार असून, तसा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. याआधी परराज्यातून राज्यात येणाऱ्यांकडे, आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक होतं. मात्र, आता ज्यांनी दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसं सर्टिफिकेट असेल, त्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
“३० वर्षे शिवसेनेत काम, पण सन्मान नाही; शिवसेना आमदाराची खंत”
तसेच, राज्यातली दुसरी लाट ओसरली आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आधीच योग्य त्या उपाययोजना करत आहे आणि पावलं उचलत आहे. राज्यात बऱ्यापैकी लसीकरणही झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार? अखेर शरद पवारांनी सोडलं मौन
- शरद पवार ‘पंतप्रधान’ पदासाठी योग्य की ‘राष्ट्रपती’ पदासाठी? शिवसेनेने मांडली स्पष्ट भूमिका
- ठाकरे सरकारने घेतलेले मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, थोडक्यात.
- ‘‘स्वबळाची तयारी सुरु केली आहे कारण…” नाना पटोलेंनी केला मोठा खुलासा!
- “मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खेळ मांडून गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे”