मुंबई : राज्यात ज्या काही आरोप-प्रत्यारोपांची स्पर्धा लागली आहे. त्याचं उत्तर आपण कामातून देऊ, आणि महाराष्ट्रात विकासाची गंगा आणू. तसेच आपण मागील चार ते पाच महिन्यापासून जे काही निर्णय घेतले आहेत. ते सर्व सामान्यांच्या हितासाठी घेतले आहेत. याची नोंद जनता ठेवत आहेत. म्हणून अल्पावधित हे सरकार लोकप्रिय झालं असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या निवासस्थानी व्यक्त केलं.
“पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
आज नाशिक महापालिकेतील अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते. आज आपण अनेक चांगले निर्णय घेतल्याने अनेकांच्या पोटात धडकी बरली आहे. त्यांच्याकडे आता आरोप-प्रत्यारोप करण्यावाचून काही शिल्लक राहिलेलं नाहीय. परंतु मी तुम्हाला कायम सांगत आलो आहे की, तुम्ही आरोप करत रहा. तुमच्या आरोपांपेक्षा दुप्पट, तिप्पट काम करत राहू असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
“हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात विकास पुर्णपणे बंद होता. सरकार बदलल्यानंतर या राज्यातील वातावरण बदललं. लोकं आनंदी झालीत. समाधानी झालीत. तसेच नाशिकमधल्या विकासासाठी हे सरकार कुठंही थांबणार नाही. पुर्ण ताकद नाशिकच्या विकासासाठी दिली जाईल. अशी खात्री देखील शिंदेंनी नगरसेवकांना दिली. तसेच भविष्यात नाशिकचा कायापलट झालेला दिसेल. असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.
दरम्यान, ठाकरे गटातील 12 नगरसेवकांनी शिंदेंची वाट धरल्याने शिंदे गटातील प्रवक्ते नरेश मस्के यांनी ठाकरे यांच्यावर टोला हाणला आहे. मुंबईच्या सकाळच्या भोंग्याचे नाशिककर बारा वाजवणार आहे. नाशिक महापालिकेच्या 12 नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार आहे. सकाळी 8 वाजता बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे.
Read also
- “निवडणुका लागल्या की, ज्यांची फाडायची त्यांची फाडीन”; राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा
- “मुंबईच्या सकाळच्या भोंग्याचे नाशिककर बारा वाजवणार.!” 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- “खिंडारवाल्या पक्षाला अजून किती खिंडार पाडायचं”; अब्दुल सत्तारांनी ठाकरेंना डिवचलं
- “वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलंय, सावध रहा;” रूपाली पाटलांचा घणाघात
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल