मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. तशी चर्चा देखील सुरू झाली असून आता या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला जात आहे. यात आता सर्वोच्च न्यायालय निकाल कुणाच्या बाजूने निकाल देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच आता १६ अपात्र आमदारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे गटाच्यावतीने १६ आमदारांवर अपात्रतेबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायधीशांच्या घटनापीठासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. यावर आज वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या निकालाबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे उद्या १६ आमदारांच्या अपात्र आमदारांबाबत निकाल लागणार आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भूमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किर्णीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे यांचा समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”