मुंबई : रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोरून वाट काढताना आव्हाडांनी एका महिलेला बाजूलं केलं. त्यानंतर आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत आव्हांडावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातच आज संबंधित महिलेने पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली.
“72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडी जवळ त्या गाडीला मी जात होते. त्यावेळी समोरून ते स्थानिक आमदार आले. त्यांनी मी स्माईल. अन् त्यानंतर त्यांनी मला म्हटलं की, तु इथे काय करतेस. आणि त्यानंतर त्यांनी हाताला धरून मागे ढकलून दिलं. परंतु त्यांनी मागे पुरूष आहेत, याचा विचार केला नाही. हे सर्व व्हिडीओ मधून दिसत आहे. असं रिदा रशीद यांनी म्हटलं आहे.
“72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
त्यानंतर तो व्हिडीओ मी घेऊन डिसीपीकडे गेलो. त्यांनी मला पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितले. त्या व्हिडीओच्या आधारे मी सांगितलं की, त्यांनी मला हात लावल्यावर जी फिलिंग आली, ते मी पोलिस स्टेशनमध्ये सांगितलं, अन् त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जे कायद्यात आहे त्यानुसार कारवाई करण्यात यावी असंही संबंधित महिलेने म्हटलं आहे.
मोठी बातमी…! जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाड यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. अन् त्यात जयंत पाटील असे म्हटले की, संबंधित महिलेने कोणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच मंदिरामध्ये देखील मोठी गर्दी असते. त्यावेळी पुजारी लोकांना हाताने ढकलून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांच्यावर देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? असा सवाल त्यांनी केला आहे.
Read also
- “जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला..!” जंयत पाटलांची माहिती
- “आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले
- महिलांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवा..! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी
- “शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे
- “लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल