मुंबई : आमच्या वेदना लक्षात येऊनही सरकारने आरक्षण दिले नाही. काल संध्याकाळपर्यंत आरक्षण मिळेल अशी आशा होती. परंतु उपोषण सुरू करून ४१ दिवस झाले तरी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. आरक्षण मिळण्यावासाठी जीवाची बाजी लावणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला असून उपोषणाला सुरूवात केली आहे.
हेही वाचा…काही तरी शिजतंय? मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांना ४० दिवसांची मुदत दिली होती. परंतु ४१ दिवस उलटूनही सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीही भूमिका घेतली नसल्याने मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता उपोषणातून माघार घेणार नाही. कोणीही उग्र आंदोलन करू नये, आत्महत्या करू नये, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे.
हेही वाचा…भरसभेत भास्कर जाधवांनी मोदींची केली मिमिक्री, मोदींवर चढवला जोरदार हल्ला
दरम्यान, तुम्ही काय मार्ग काढलाय ते सांगा? उपोषण सुरू झाल्यावर नेत्यांसोबत बोलणार नाही. ४१ व्या दिवशीही सरकारकडून आरक्षणावर कोणताच निर्णय नाही. आजपासून सुरू झालेलं उपोषण अत्यंत कडक असेल. मराठा आरक्षणाशिवाय आता थांबणार नाही. असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार