मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित राज्यातील 20 ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. एनआयएने बोरीवली, सांताक्रुझ वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील ठिकाणी छापे टाकले आहेत. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएऩे ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली आहे.
“बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
एनआयएऩे दहशतवादी दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळत आहे. कारण ठाकरे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात आणि लोकांची घरे तोडण्यात व्यस्त आहे. अशी खोचक टिप्पणी भाजपने केली आहे. यावर आता आघाडीतील नेते काय प्रतिक्रिया देणार ? ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
एनआयएऩे दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्या संबंधित चौकशी आणि छापेमारू सुरू आहे. एऩआयएने केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांचा तपास करणार नाही. तर कुख्यात गुंड छोटा शकि, जावेद चिकना, टायगर मेनन. इक्बाल मिर्ची { मृत } दाऊदची बहिण हसिना पारकर ( मृत ) यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी डी कंपनी ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच वेळी 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला 2003 मध्ये सयुंक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याच्यावर 25 दशलक्ष बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दाऊद इब्राहिम संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएऩेकडे सोपवला आहे.
Read also:
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार
- तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी
- “वसंत, तु मिसळ महोत्सव घे, मी येतो”; राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला शब्द
- “राज्य आता पवारांपासून वाचवण्याची वेळ आलीय”; सदाभाऊ खोतांची राष्ट्रवादीवर जोरदार टिका
- “मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना