नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेस एकसंघ आहे, कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. येत्या निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष म्हणून उभारी घेईल. कारण काँग्रेसची मुळं महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहेत. महाराष्ट्रातील ४८ जागांवर आमची तयारी आहे, जी जागा मित्रपक्षाला जाईल तिथे त्याला काँग्रेसचे बळ मिळेल. महाराष्ट्रात आलेल्या तिनतिघाडा सरकारने कसे ED आणि खोक्यांचा वापर करुन, दहशत आणि भीती निर्माण करून आमदारांना विकत घेण्याचे काम हे आम्ही जनतेसमोर मांडू असं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सध्या मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काॅंग्रेसमध्ये देखील फुट पाडली जाईल, अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात केली जात आहे. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड करून शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं. यातच आता विधिमंडळात सर्वात जास्त संख्या काॅंग्रेसची असल्याने विरोधी पक्षनेते पद देखील त्यांच्याकडे जाणार. या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज राज्यातील काॅंग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झाले.
हेही वाचा…शरद पवार गटाने बाहेर काढलं, अजित पवार गटाने जवळ घेतलं, राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या नियुक्त्या
दिल्लीत होत असलेल्या काॅंग्रेसच्या बैठकीसाठी राज्यातील २५ नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह अनेक बडे नेत्यांना दिल्लीच्या बैठकीत बोलवण्यात आले आहे. या बैठकीत काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे राहुल गांधी उपस्थित राहणार असून राज्यातील विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादीने दिली जबाबदारी, अजित पवार गटाच्याविरोधात मोठी रणनीती
हेही वाचा…अजित पवार यांच्याकडील अर्थखातं बरोबर राष्ट्रवादीला मिळणार ‘ही’ खाती
हेही वाचा…“राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आम्हाला २०० कोटी रूपये द्या,” मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी तर उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा”,भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…कामाला लागा..! सर्वात जास्त जागा निवडून येतील, काॅंग्रेसला महाराष्ट्राकडून अपेक्षा, वरिष्ठ नेत्यांचे आदेश