मुंबई : देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासर्गीयांवरील अत्याचार हे बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पक्त ही अत्यंत अस्वस्थ करणारी असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. परंतु देशातील एव्हाना राज्यातील निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भा एक फेसबुक पोस्ट देखील लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, उद्या ५ ऑगस्ट माझा वाढदिवस . लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत ह्दयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकद ५ तारखेला मिळते, पण मला माफ करा. ह्या ५ तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद, नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा धोका वाढला”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही. तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा.
हेही वाचा…कोर्टातली सुनावणी लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘तीन’ आदेश
मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे. लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
उद्या 5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.
देशात…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात, नोटीसेला उत्तर देण्यासाठी दिली ‘ही’ तारीख
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित