पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पक्ष फुटीनंतरही अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी होत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तर राज्यातील विरोधी पक्ष नेतेही याबाबत संभ्रम अवस्थेत गेलेले दिसून येत आहेत. यातच आता पक्षात कोणतीही फुट झाली नसल्याचं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”
आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केलं. सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार असून महाराष्टाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आहेत. एका गटाने फक्त वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फुट पडलेली नाहीय. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसेच भाजपने आतापर्यंत तीन ते चार वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आता त्यांना राष्ट्रवादी फोडण्यात यश आलं आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते, मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील नेत्यांनी मानले इस्रोचे आभार
दरम्यान, पक्षात फुट झाली नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून करण्यात येत आहेत. परंतु राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत आणि दुसरा गट विरोधात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तब्बल चारवेळा बैठका झाल्याने राजकीय वर्तुळात याबाबत मोठी चर्चा केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मनु आजोबा ‘चंद्रावर तिरंगा’ फडकला, लई वाईट वाटलं असलं बघा”, अजित पवार गटाच्या आमदाराची भिडेंवर जहरी टिका
हेही वाचा…शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरण, शिंदे गटाच्या आमदारांंचं ६ हजार पानी लेखी उत्तर, उत्तारात दडलंय काय ?
हेही वाचा…भुजबळ झाले, मुंडे झाले, आता मुश्रीफ, शरद पवारांचा हुंकार कोल्हापुरात गुंजणार
हेही वाचा…महाविकास आघाडी इंडिया बैठकीसाठी सज्ज, बैठकीपुर्वी पत्रकार परिषद होणार
हेही वाचा…“राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काका शरद पवार गटात तर पुतण्या अजित पवार गटात दाखल”