मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वाचल्यावर हे लक्षात येते की महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली तो सत्ता-संघर्ष नव्हता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने घडवून आणलेला ‘सट्टा’ होता व त्याला सल्ला घेऊन संघर्षाचे स्वरूप देण्यात आले. असं वकिल असीम सरोदे यांनी म्हटले आहे. त्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर द्यावे. असंही सरोदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“राणेंनी राज ठाकरेंची इज्जतच काढली…! १ आमदार असलेल्या पक्षांनी ३०२ खासदार असलेल्या पक्षांबद्दल बोलू नये”
सत्तासंघर्षामुळे जगातील ३३ देशांनी एकनाथ शिंदे यांची दखल घेतली असे एकनाथ शिंदे फार गर्वाने सांगत होते. पण खरेतर भारतातील महाराष्ट्रात किती सत्तालोलुप, भ्रष्ट, लाचार, लोकशाी बरबटून टाकणारे अनैतिक राजकारण होऊ शकते हे बघून जगातील ३३ पेक्षा जास्त देशांमध्ये भारताची बदनामी झाल्याचंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…सावनेर मतदार संघात काॅंग्रेसचे दोन नेते आमनेसामने, देशमुख केदारांच्या विरोधात दंड थोपडणार?
दरम्यान, राज्यात दहा महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एक आठवडा चाललेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची चर्चा संपुर्ण देशभरात चर्चेला आली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वाचल्यावर हे लक्षात येते की हा महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली तो “सत्ता-संघर्ष” नव्हता तर @mieknathshinde यांच्या मदतीने घडवून आणलेला “सट्टा” होता व त्याला सल्ला घेऊन संघर्षाचे स्वरूप देण्यात आले.@narendramodi @Dev_Fadnavis जबाब दो !
— Asim Sarode (@AsimSarode) May 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…आघाडीच्या ‘त्या’ समितीत सेनेकडून संजय राऊतांचं नाव निश्चित, तर दुसरा नेता कोण ?
हेही वाचा…कर्नाटकतला पेच मिटला..! ‘सिद्धरामय्या’ मुख्यमंत्री तर ‘डी. के. शिवकुमार’ हे उपमुख्यमंत्री ?
हेही वाचा…मोठी बातमी..! देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, सक्तीच्या विश्रांतीवर
हेही वाचा…संसदेतील जबाबदार लोकप्रतिनिधींची पिंपरी-चिंचवडला बेजबाबदार वागणूक?
हेही वाचा…“शरद पवारांनी राज्यात आघाडी निर्माण केल्याने राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर”, जयंत पाटील