कोल्हापुर : गेला आठवडा झाला कोल्हापूरातील वातावरण बिघडलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच आकस राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर असो किंवा अन्य २२ वतनदार असो वा सैन्याचे प्रमुख असो या सर्व विश्वासूंशिवाय महाराज स्वराज्याची लढाई लढू शकले नसते. इतके सैन्य प्रमुख व मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई केली. त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
हेही वाचा…“शरद पवार प्रत्येक वेळी सांगतात, पण मोदीजीच निवडून येतात”, फडणवीसांचा टोला
मुस्लिम धर्मीयांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून हा इतिहास समजून सांगण्याची आवश्यकता आहे, असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. धर्म हा आपापल्या घरी ठेवून सामाजिक वातावरण शांत राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. टिपू सुलतान याचे स्टेटस ठेवले म्हणून पुन्हा वातावरण बिघडले होते. त्या तरुणास अटक केली. अशा घडणाऱ्या घटनांसाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अशा घटनांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हिंदू-मुस्लिम समाजाने एकमेकांमध्ये सलोखा राहून शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, कोल्हापुरात टिपू सुलतानाचे फोटो झळकावल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ देखील करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदेंची राज्याबाहेरच पहिल्यांदाच बैठक, केंद्र स्तरावर भाजपसोबत काम करण्यास शिंदेंची सुरूवात
हेही वाचा…कल्याणमध्ये खरचं भाजप श्रीकांत शिंदेंची ‘गेम’ करू शकते का? राजकीय गणित काय सांगते
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला, पण ‘या’ कारणांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली
हेही वाचा…वारीत फडणवीसांच्या नावाच्या टोप्या, “वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा”, राष्ट्रवादीचा इशारा
हेही वाचा…” त्यामुळेच राऊतांकडून नितेश राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा, राणे-राऊत वाद हायकोर्टात पोहचला”