विरेश आंधळकर, ठाणे : महाविकास आघाडीला जोरदार झटका देत सत्तेवर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची लवकरच वर्षपूर्ती होणार आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये समन्वय असताना दुसरीकडे राज्यामध्ये अनेक ठिकाणी युतीमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनाच थेट आव्हान देण्याच काम सध्या भाजप नेत्यांकडून होत आहे. “कल्याणचा पुढील खासदार भाजप ठरवणार” अशा वल्गना केल्या जात आहेत.
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपकडून आव्हान दिले जात असल्याने श्रीकांत शिंदे यांची स्वतः पुढे येत आपल्याला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, युतीसाठी वेळ पडल्यास आपण खासदारकीचाही राजीनामा देऊ, असं सांगितलं. खासदार शिंदे आणि स्थानिक भाजप नेतृत्वातील वाद हा काही नवीन नाही, परंतु मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी शेखर बागडे यांच्यावरून सुरु झालेला वाद युतीमध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे. भाजपकडून दंड थोपटले जात असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये खरच श्रीकांत शिंदे यांना ते कात्रजचा घाट दाखवू शकतात का? याचे गणित पाहणे महत्वाचे आहे.
हेही वाचा…“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य
ठाणे लोकसभा मतदारसंघ विभाजन होऊन कल्याण-डोंबिवली मतदारसंघ अस्तित्वात आला. यामध्ये कल्याण पूर्ण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अंबरनाथमध्ये शिंदे यांच्यासोबत असणारे बालाजी किणीकर हे आमदार आहेत. उल्हासनगरमध्ये कुमार अलानी, कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड आणि डोंबिवलीमध्ये विद्यमान सरकारमधील मंत्री रवींद्र चव्हाण असे भाजपचे तीन आमदार आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील, तर मुंब्रा कळव्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड प्रतिनिधित्व करतात.
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणारा हा भाग असून २०१४ आणि २०१९ साली श्रीकांत शिंदे रेकोर्डब्रेक मतांनी विजयी झाले होते. शिंदेंनी सत्तेच्या माध्यमातून अनेक विकासकामे या मतदारसंघात केलेली असली तरी बहुतांश भागात पाणी, रस्ता आणि वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. शिंदे यांच्या बंडानंतर नेते त्यांच्यासोबत गेले, मात्र सामान्य कार्यकर्ते आजही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची परिस्थिती आहे. ठाकरेंना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे साथ दिल्यास शिंदेंना तगडी लढत मिळू शकते. मनसेची कल्याण ग्रामीण वगळता इतर भागामध्ये फारशी संघटना बांधणी नाही. तीच परिस्थिती राष्ट्रवादीची असून जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा कळवा वगळता फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे विरोधक श्रीकांत शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी कमी पडताना दिसत असल्याचं मत जाणकारांकडून वक्त करण्यात येत आहे.
विरोधकांची ताकद विखुरलेली असली तरी श्रीकांत शिंदे यांच्या पुढे मुख्य आव्हान आहे ते मित्रपक्ष भाजपचे. डोंबिवली हा आरएसएचा गड मानला जातो. त्यामुळे भाजपचा पगडा येथे जास्त आहे. संघटन पातळीवर देखील एकवाक्यता दिसून येते. रवींद्र चव्हाण हे भाजपकडे प्रभावी पर्याय आहेत. तसेच आरएसएसची यंत्रणा भाजपसाठी जमेची बाजू असून हा वाद असाच कायम राहिल्यास शिंदेंना डोकेदुखी ठरू शकते. परंतु धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे हे साम-दाम-दंड-भेदसाठी ओळखले जातात. शिंदेंनी यंत्रणा कामाला लावल्यास हा वाद पेल्यातील वादळ ठरू शकते.
READ ALSO :
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला, पण ‘या’ कारणांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली
हेही वाचा…वारीत फडणवीसांच्या नावाच्या टोप्या, “वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा”, राष्ट्रवादीचा इशारा
हेही वाचा…” त्यामुळेच राऊतांकडून नितेश राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा, राणे-राऊत वाद हायकोर्टात पोहचला”
हेही वाचा…“शरद पवार प्रत्येक वेळी सांगतात, पण मोदीजीच निवडून येतात”, फडणवीसांचा टोला
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य