मुंबई : आयएल आणि एफएस या कंपनीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची ईडीने जवळपास ९ तास चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत सखोल माहिती दिली. यातच ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचे फोन आलेत, परंतु अजितदादांचा फोन आला नाही. असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी सुरू झाली का ?असा सवाल उपस्थित केला गेला. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…आघाडीत आता भाऊ बंदकी…! कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ, ? जागावाटपावरून संघर्ष सुरू ?
केंद्रीय तसेच राज्यस्तरीय ज्या यंत्रणा आहेत, त्यांना नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार आहे. काल जयंत पाटलांना रात्री साडेनऊ वाजता ईडीने सोडल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. यातच डबक्या आवाजात अनेक मान्यवर वेगवेगळी भूमिका बोलतात. यातच मागे अधिवेशन सुरू असताना पुरावणी मागण्यांच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने काय सांगितलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्याआधी काॅंग्रेसच्या नेत्यांनी काय सांगितलं आहे. ते पण आपण पाहिलं आहे. असंही अजि त पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…” आघाडीत आता राष्ट्रवादीचं मोठा भाऊ,..” अजित पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये रंगला कलगीतूरा
तसेच जयंत पाटलांना ईडीने एकट्याला बोलवलं नाही. त्याआधी छगन भुजबळ, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल यांना बोलावलं होतं. त्यावेळीची माझे विधानं काढा. त्यानंतर मी कुणीही बाबतीत वक्तव्य करीत नाही. कारण माझ्याही बाबतीत आयकर विभागाने २२ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी मला जे काही वक्तव्य करायचं होतं. ते मी केलं अन् कामाला लागलो. अस अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात काही प्रमुख नेत्यांची कामं असतात, ते त्यात गुंतलेले असतात. ते काम सोडून मुंबईत यावं, अन् सगळ्यांना माहिती आहे की जयंत पाटील स्वच्छ आहे. चौकशी झाल्यानंतर ते बाहेर येणार असल्याची खात्री असल्यामुळे अन् त्यांचा माझ्यावर विश्वास असल्याने ते आज उपस्थित राहले नाहीत. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या गैरहजरीवर दिली आहे. यातच महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा फोन आला पण अजित पवारांचा फोन आला नाही. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“घोडामैदान जवळ आहे, मंत्री झालो नाही तर…” बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?
हेही वाचा…राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी..! “सगळ्यांचा फोन आला, पण अजितदादांचा फोन आला नाही,” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…‘भावी पंतप्रधान’ म्हणून सातत्याने डिवचलं, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले, “पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी..”
हेही वाचा…जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी, राष्ट्रवादीचं आंदोलन, फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“..तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते..” शिंदे गटाच्या आमदारानी व्यक्त केली शक्यता