मुंबई : शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी 5 न्यायाधीश्यांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर होणारी सुनावणी 25 ऑगस्टला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. घटनापीठ स्थापन करण्याच्या निर्णयाला उशिर झालेला आहे. गेल्या दोन महिन्यापासुन सांगत आहे. यामध्ये घटनेचे अनेक प्रश्न आहेत. राज्यपालांचे अधिकार काय, निवडणुक आयोगाचे अधिकार काय, पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ काय हे सगळे घटनेशी निगडीत प्रश्न आहेत. त्यामुळे आधी घटनापीठाकडे जायला पाहिजे होतं. आज ते गेलं आहे. येणाऱ्या आठ दहा दिवसात त्यांनी अंतिम निर्णय दिला तरी समाधान होईल, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.
“माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
यामध्ये भारताच्या लोकशाहीचा प्रश्न आहे. फेर निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाकडून स्पष्टीकरण मिळणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अनेक निर्णय हे घटनाबाह्य आहेत. घटनेप्रमाणे पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. तसाच मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक आहे. फक्त राज्यपालांना तारतम्याचे अधिकार आहेत. ते काय आहेत हे घटनेमध्ये लिहलेले आहेत. राज्यपालांनी जे केलं आहे ते पुर्ण त्यांच्या अधिकाराच्या बाहेर होतं. सुप्रिम कोर्टाने त्यांना सांगायला पाहिजे की आपण केंद्र सरकारचे नोकर नाही, आपण राज्याचे घटनात्मक प्रमुख आहात, असा टोला उल्हास बापट यांनी राज्यपालांना लगावला आहे.
पक्षांतर बंदी कायदा हा पक्षाशी किती निष्ठा आहे हे तपासण्यासाठी आहे. जर पक्षातुन बाहेर पडणार असाल तर राजीनामा द्या लोकांकडे जा आणि पुन्हा निवडुण या ही अपेक्षा आहे. शिंदे हे एका गटाचे मुख्य आहेत. मुख्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे एकाद्याला पक्षातुन काडून टाकायचे का हा अधिकार अजुनही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
सुप्रिम कोर्टाचा निर्णय लागे पर्यंत कोणाकडे चिन्ह आहे याचा अंतिम निर्णय देऊ नका असं सांगितलं आहे. त्यामुळे चिन्ह हे शिवसेनेकडेच आहे असं दिसत आहे. शिवसेना प्रमुखापासुन ते ग्रामपंचायतीपर्यंत जास्त समर्थक कोणाच्या बाजुने आहेत यावरून शिवसेना कोणाची आहे हे ठरणार आहे. हे ठरवण्याचा अधिकार निवडणुक आयोगाला आहे, असंही उल्हास बापट म्हणाले.
Read also
- खिशाला परवडणारं पूर्णब्रम्ह, या मेन्यू ला तोड नाही! अमोल कोल्हेंची जागतिक वडापाव दिनी खास पोस्ट
- “नरेंद्र मोदींना बांधलेल्या राखीचा विपरीत अर्थ कोणी काढु नये”
- “सोन्याची अंडी देणारी कोंबडी, शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षांपासून गिळली”
- “दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
- “माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”