कोल्हापूर : मराठा आरक्षणाप्रश्नी आज संभाजीराजेंच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आंदोलन होत असून, त्यांनी मराठा समाजाला मूक मोर्चाची साद दिली आहे. त्यानुसार आज, शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून, शाहू महाराजांच्या आशीर्वादाने या मूक मोर्चाला सुरुवात झाली असून, यावेळी मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यांसारख्या नेत्यांनी, तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व आमदार-खासदार यावेळी आंदोलनस्थळी पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते.
हे पण वाचा, धैर्यशील मानेंनी उंचावले आंदोलनकर्त्यांचे मनो”धैर्य”, हाताला सलाईन लावून लावली आंदोलनस्थळी हजेरी
यावेळी, ‘आरक्षणाबाबत पंतप्रधानांची भूमिका अजूनही समोर आलेली नाही. त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा. मराठा आरक्षणावर आता मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, या आंदोलनामुळे दिल्लीलाही जाग येईल. मात्र, यासाठी एकटा संभाजी पुरा नसून सर्व ४८ खासदारांनी एकत्र येऊन मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा. मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. हे आरक्षण मिळावं म्हणून, आतापर्यंत ५८ मोर्चे शांततेत काढले गेले. त्यामुळे, आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. तसेच, याबाबत राज्याने देखील आता पुनर्विचार याचिका दाखल करावी,’ असं परखड मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मांडलं आहे.
हे पण वाचा, संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक -सतेज पाटील
दरम्यान यावेळी, ‘हे आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना मागणी केली आहे. मात्र, असे असले तरी, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खास अधिवशेषण बोलावण्यात यावं. तसेच, राज्यतल्या ४८ खासदारांनी लोकसभा सभापतींकडे आणि राष्ट्रपतींकडे पत्र लिहून ही मागणी करावी,’ असं आवाहनही शिवसेना खासदार धैर्यशील मानेंनी केलं आहे.
हे पण वाचा, मराठा समाजाला योग्य मार्गाने आरक्षण मिळेल, ‘तो’ मार्ग सरकारने निवडावा – प्रकाश आंबेडकर
तर, ‘संभाजीराजेंच्या मागण्यांबद्दल महाविकास आघाडी सरकार १००% सकारात्मक असून, सरकार समाजासाठी एक पाऊल पुढे येऊन पुन्हा एकदा भेटून चर्चा करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी सरकार संभाजीराजेंना उद्याच वेळ द्यायलाही तयार आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन, मिळून यातून मार्ग काढावा,’ असं मत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी मांडलं आहे.
Read Also :
- केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; तब्बल २३ जणांच्या समावेशाची शक्यता!
- राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन ५ जुलैला होणार
- भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याच्या आरोपावरुन आमदारांमध्ये वादावादी
- आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू – संजय राऊत
- जायकवाडी ३३ टक्के पाणी साठा शिल्लक; रोज होतोय ४५० गावांना चार दिवस पुरेल इतक्या पाण्याचे बाष्पीभवन