सिंधुदुर्ग : ज्यावेळी बाबरी मशिद पाडली, तेव्हा शिवसेनेचा एकही मंत्री त्याठिकाणी गेला नव्हता. असं वक्तव्य काल राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी बुस्टर सभेत केलं. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून फडणवीसांवर जोरदार टिका केली जात आहे. आता यावरून 29 वर्षानंतर देवेंद्र फडणवीसांना अक्कल दाड आली का ? असा प्रतिसवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी फडणवीसांना केला आहे.
“महागाई अन् बेरोजगारीचं अपयश लपवण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना सुपारी”; पटोलेंची भाजपवर खरमरीत टिका
अख्या देशाला माहिती आहे, ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा भाजपचे सर्व वरीष्ठ नेते शेपडी घालून पळत होते. ढसाढसा रडत होते. त्यावेळी बाळासाहेबांनी बाबरी मशीद पाडणाऱ्याना आधार दिला. मुख्यमंत्री होत नाही म्हणून देवेंद्रचा सध्या स्मृतीभ्रंश झाला. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. असा हल्लाबोल विनायक राऊतांनी केला आहे. लोकसभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे रडले आणि अडवाणीनी जे वक्तव्य केले. ज्यांनी बाबरी मशीद पाडली तेव्हा भाजपचे कोणी नव्हते, हे एकदा त्यांनी तपासून पहावे. त्यावेळी भाजपचे नेते कोणत्या बिळात लपले होते आणि आमचा शिवसैनिक कोणत्या बुरुजावर चढला होते हे मीडियाने त्यावेळी दाखवलं होत असे विनायक राऊत यांनी सांगितले.
“नवनीत राणांची तब्येत बिघडली?”; राणांच्या वकिलांचे कारागृह अधिक्षकांना पत्र
मनसेने आपला पक्ष केवळ भाड्यावर ठेवलेला आहे. जेव्हा कुणाला गरज लागेल, तेव्हा भाड्याने देतोय असं सांगितले असल्याने त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कालची सभा आम्ही ऐकली पण नाही आणि पाहिली पण नाही. असे किती आले आणि किती गेले, शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार भक्कम राहील त्याला कुणाचाही धोका नाही. नकला करून पक्ष चालत नसतो, असे किती आले आणि किती गेले. मनसेने आपला पक्ष केवळ भाड्यावर ठेवलेला आहे. अशी जहरी टिका देखील त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच नारायण राणे आमच्या दृष्टिकोनातून संपलेला दुकान आहे. त्या दुकानाला कुठेही गिऱ्हाईक नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंच्या शिवसेनेला सभेना गर्दी नसते या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेले वक्तव्य बोलत आहे. भोंग्या संदर्भातला प्रश्न हा देशपातळीवरचा प्रश्न असल्याने मनसे प्रमुखांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या पक्षाची तळी उचलता त्या पक्षाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा आणि कायदा करून घ्या मग तुम्हाला रस्त्यावर उतरायची गरज नाही. ओवेसी म्हणजे ज्यांचा पूर्वइतिहस पाहिला तर केवळ औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून काम करणारी ही मंडळी ही देश विघातक आहेत. त्यांचे वक्तव्य आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यांना जागा दाखवून देण्याचे काम यापूर्वी अनेक ठिकाणी झालेला आहे. असंही ते म्हणाले.
‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
शिवसेनेला अंडरएस्टिमेट कुणी करू नये, यापूर्वीसुद्धा बऱ्याच जणांचा जन्म झाला आणि अस्तही झाला. मात्र शिवसेना त्यापेक्षाही अधिक गतीने चालत आहे. त्यामुळे शिवसेना संपवण्याची सुपारी कोणी घेत असेल तर ते सांगतील मात्र शिवसेना जबरदस्त ताकद ताकतीनिशी उभी राहील. नकला करून पक्ष चालत नसतो, त्यासाठी मेहनत करावी लागते. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मेहनतीने महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत. ती मेहनत अशा नकलाकारांना जमणार नाही. नकला ठीक आहे करमणूक होतेय, अशी नकला करणाऱ्या राज ठाकरेंना विनायक राऊत यांनी टोमणा मारला आहे.
Read also:
- “अशांतता माजवणाऱ्यांना जनता थारा देणार नाही”; रोहित पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं
- “राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर” अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
- राजकारण तापलं! “ओळख ना पाळख..भटमान्य टिळक म्हणत संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंवर टिका
- “संजय राऊतांचा बाबरी मशिदीशी काय संबंध”; राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
- प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!