रत्नागिरी : सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढण्यास इच्छूक नाही, परंतु पक्षाने आदेश दिला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुती कोणाला संधी देणार ? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून नारायण राणे यांना डिवचण्यात आलं आहे.
हेही वाचा…“तुमचा संपूर्ण भाजप जळून खाक होईल, एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात “
रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत असून त्यांनाच पुढे उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. यातच आता त्या निवडणुकीत नारायण राणेंचं पाहिजे. असा टोला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी लगावला आहे. तसेच वैभव नाईक आणि तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला आहे. असं म्हणत विचारे यांनी राणेंना डिवचलं आहे. त्यामुळे हा पुर्व इतिहास आहे. तसेच शिंदे गटाकडून उमेदवार आयात केला तरी विनायक राऊतांची हॅट्रिक करू असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई
दरम्यान, यावर बोलतांना विचारे म्हणाले की, आम्हाला त्याठिकाणी नारायण राणेंच उमेदवार पाहिजे. वैभव नाईक सारख्या तरूण तडपदार सारख्या नेत्याने त्यांचा पराभव केला आहे. मुंबई सारख्या मोठ्या महानगरांमध्ये तृप्ती सावंत सारख्या एका महिलेने शिवसेनेकडून त्यांना पराभूत केला होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अन् आमचे उमेदवार विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडून विजयाची हॅट्रिक साधतील. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..महायुतीत गर्दी वाढली, उमेदवारांची आशा माळवली, विदर्भाचा भाजपचा बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर ?
हेही वाचा…मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलंय, ‘हा’ उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचाबीड लोकसभा निवडणुक लढवणार का ? पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेत बदल, म्हणाल्या…
हेही वाचा…उद्या रायगडावर शरद पवार गटाची ‘तुतारी’ धुमणार, भव्य लॉंन्चिंग सोहळा, लोकसभेचं रणशिंग फुंकणार
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक लढवून दिल्लीत जाणार का ?” फडणवीसांनी ‘त्या’ चर्चेला दिलं पुर्णविराम, म्हणाले…