– बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची मिळाली सशर्त परवानगी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बैलागाडा शर्यती सुरू करण्याबाबत गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला आज यश मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने बैलागाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली. बैलगाडा शर्यतीसाठी पाठपुरावा करणारे भाजपा आमदार महेश लांडगे आणि अखिल बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच जल्लोष केला.
आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बैलगाडा शर्यतीची लढाई जिंकली – देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत आज (दि. १६ ) अंतिम सुनावणी झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून ॲड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे राधाकृष्ण टाकळीकर यांनी दिली.
“..या लढ्याचे नेतृत्व करणारे आ. महेश लांडगे यांचे अभिनंदन”; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
दरम्यान, महेश लांडगे यांनी गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकला आहे. बैलगाडा शर्यतीची सुनावणी ६ डिसेंबर आणि १५ डिसेंबर अशी दोनदा झाली. यावेळीही लांडगे दिल्लीत हेाते. आज अंतिम सुनावणी असल्यामुळे बैलगाडा शर्यतप्रेमी आणि शेतकऱ्यांनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले होते.
बैलगाडा शर्यतीला परवानगी: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून महेश लांडगेंचे तोंडभरून कौतूक
अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत सकारात्मक निकाल दिला. त्यावेळी न्यायालयाच्या आवारातच ‘नाथ बाबांचा’ जयजयकार झाला. महाराष्ट्राच्या लाल मातीतील पैलवान असलेल्या आमदार लांडगे आणि सहकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतीचा लढा जिंकला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रतिक्रिया उमटू लागली. ‘‘ शाब्बास ने महेशदादा… महाराष्ट्राच्या रांगड्या पट्टयाचा यावेळी माजी महापौर राहुल जाधव, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नितीन आबा शेवाळे, संदीप बोदगे, धनाजी शिंदे, संदीप भाई माळी, रामकृष्ण टाकळकर, अनिल लांडगे, महेश शेवकरी, आनंदराव मोहिते, पैलवान विलास देशमुख,केतन जोरे, महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड ,विनायक आबा मोरे,विजय काळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रभरातून आमदार लांडगेंचे कौतूक :
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या जनआंदोलनाला न्यायालयात यश मिळाले. याबाबत राज्यातील मान्यवरांनी आमदार लांडगे यांचे कौतुक केले आहे.
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र :
आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. 2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली. अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. ‘रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे.
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा :
आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी वारंवार पाठपुरवठा केला. विशेषत: गेली अनेक दिवस सुनावणी दरम्यान लांडगे यांनी दिल्लीत तळ ठोकून बसले. त्याचबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलने केले. त्यांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज यश मिळाले. त्याबद्दल त्यांच मनापासून कौतूक करतो, असे पाटील म्हणाले.
योगेश टिळेकर, प्रदेशाध्यक्ष, ओबीसी मोर्चा, भाजपा :
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे २०११ पासून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी घातली होती मात्र आमदार महेशदादा लांडगे बैलगाडा शर्यती परत सुरू वकरण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती सशर्त सुरू करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायदा केलेला आहे. परंतु, या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित होता. मात्र आमदार महेश दादा लांडगे यांनी सातत्याने या खटल्याचा पाठपुरावा केला. स्वतः त्यांनी वैयत्तिक लक्ष घातलं. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळेच बैलगाडा शर्यती परत सुरू केल्या असून त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला न्याय मिळून दिला. यात त्यांचे खूप मोठं यश आहे. त्यामुले मी आदरणीय महेशदादा लांडगे यांचे अभिनंदन करतो त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रील शेतकरी खऱ्या अर्थाने आनंदित झाला आहे.
चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजपा :
“महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या जिव्हाळ्याची बैलगाडाशर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या११ वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळालयं या लढ्याचे नेतृत्व करणारे आमदार महेश लांडगे तसेच सर्व बैलगाडाप्रेमी राज्यातील शेतकरी या लढ्यात सहभागी प्रत्येकाचे अभिनंदन..” असे ट्विट करत चित्र वाघ यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे.
Read Also :
- राजसाहेब… सांगा ना, माझं कायं चुकलं? औरंगाबादेत मनसे नेत्याची नाराजी
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव