सोलापूर : शिवसेनेचे शिवसेनेच्या आक्रमक नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेतील सदस्य संख्या ही राष्ट्रवादी आणि शिवसेना समसमान झाल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडून जाणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीला मिळावे अशी मागणी केली आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांना जोरदार सुनावत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने विरोधी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादीकडे देण्यात यावं, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट असे महाविकास आघाडीतील तीन पक्ष आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषदेतून शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. यातच काकासाहेब कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांची तुलना संजय राऊत यांच्याशी केली आहे.
हेही वाचा…“ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नऊ नऊ जागा होत्या. मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागा कमी झाल्या. परंतु या संदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामध्ये इतरांनी लुडबुड करू नये. अमोल मिटकरी यांनी आता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांच्यात उद्याचा संजय राऊत मला आज दिसतोय. मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबलं तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचित होतील. अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही . असा इशारा देखील काकासाहेब कुलकर्णी यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही”, ठाकरेंच्या विराट मोर्चावर शिंदेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“गुलाबराव पाटलांना ५०० रुपयांचा दंड, एकनाथ खडसेंवर केलेले ते आरोप पाटलांना भोवले”
हेही वाचा…ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत ५ ते ६ माजी नगरसेवक गैरहजर, चर्चांना उधाण