मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना त्याचा मोठा फटका बसला. अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भाषणांमधून बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यातच आता शिवसेनेचे विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? हे मला माहितीय”; उदय सामंत
अलिकडेच ठाकरे कुटुंबीयांवर टिका केल्याने रामदास कदम हे शिवसेनेच्या निशाण्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी या संपुर्ण प्रकरणाची माफि देखील मागितली होती. यावरूनच शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रूजवली असल्याची टिका विनायक राऊतांनी केली आहे. रामदास कदम जी काही बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
“अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं
तसेच राऊतांनी एक नारायण राणेंचा किस्सा देखील त्यांनी सांगितला. नारायण राणे शिवसेना सोडून जात चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते. नारायण राणे यांच्यासोबत राणे गटात या, असे शिवसैनिकांना सांगण्यात कदम आघाडीवर होते, असा गंभीर आरोप देखील राऊतांनी रामदास कदम यांच्यावर केला आहे.
Read also
- “ऐन सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली”; सुप्रिया सुळे
- “बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका”; चंद्रकांत खैरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “शरद पवारांचं नाव अन् काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल?”
- “शिरूरच्या राजकारणात अशी गद्दार लोकं आढळता कामा नये”; ठाकरेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
- “शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदमांनीच रूजवली” राऊतांचा हल्लाबोल