मुंबई : महाराष्ट्रात सध्या भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात जोरदार संघर्षाला सुरुवात झालीय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली. त्यांची अलिबागमधील काही संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलीय. यानंतर किरीट सोमैया यांनी एक वक्तव्य केलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की लवकरच संजय राऊत हे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत तुरुंगात असतील. यानंतर त्यांना उत्तर म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील तितक्याच आक्रमकतेने किरीट सोमैयांना उत्तर दिलंय. एवढंच नाही तर संजय राऊत यांनी किरीट सोमैयांवर खळबळजनक आरोप केले आहेत ज्यामुळे सोमैयांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंना 3 महिन्याचा तुरूंगवास; नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी
झालं आहे असं की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने २०१४ साली विक्रांत युद्धनौका भंगारात विकण्यासाठी काढली होती. आयएनएस विक्रांत युद्धनौकेला वाचविण्यासाठी किरीट सोमैया यांनी एक बचाव मोहीम सुरु केली होती. यामध्ये त्यांनी युद्धनौका वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला. हा निधी आपण राजभवनाकडे सुपूर्द करणार आणि युद्धनौका वाचवणार असं म्हटलं होतं. मात्र आरटीआय कार्यकर्त्यांनी जेव्हा माहिती अधिकारात राजभवनाकडून यासंदर्भात माहिती मागितल्यानंतर त्या माहितीअधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजभवनाकडे आयएनएस विक्रांत संदर्भात कोणताही निधी आलेला नाही असं सांगण्यात आलंय.
हिंदू एकता आवाज आलाच पाहिजे, मंदिरावरील भोंगे मोफत देऊ; भाजप नेत्याची घोषणा
यामुळे आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी जमा केलेला ५० ते ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. यावरून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत किरीट सोमैयांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. एवढंच नाही तर नौदलाचे काही माजी अधिकारी यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही समोर आलीय. किरीट सोमैयांचे पुत्र निल सोमैया यांनी त्यांच्या निकॉन इन्फ्रामध्ये हा सर्व पैसा वळविल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यामुळे आता किरीट सोमैयांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
राजू शेट्टींची मोठी घोषणा; शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर
दरम्यान, मागच्या अनेक दिवसांपासून किरीट सोमैया हे महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मागे हात धरून मागे लागले आहेत. जर आता त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले तर कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी किरीट सोमैया यांना सोडणार नाही हे निश्चित आहे. आता संजय राऊतांनी फोडलेला बॉम्ब हा खरच आवाज करणार की फुसका निघणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून आहे.
Read also:
- एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की..; वसंत मोरेंची मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेट
- राज ठाकरेंचा आदेश हा अंतिम; वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर मनसेत दोन प्रवाह
- “कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम मतदानाआधीच विजयी”; चंद्रकांत पाटलांचा दावा
- निलेश लंकेंच्या निकटवर्तीयांची दबंगगिरी; पाणीपुरवठा अभियंत्याला मुख्य अधिकाऱ्यांसमोरच चोप
- साहेब भरपावसात भिजले अन् सत्ता स्थापन झाली; तिकडे आघाडीचीही पावसातील सभा गाजली