नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने बीआरएसला धोबीपछाड दिलं. काॅंग्रेस तेलंगणात १९९ विधानसभा जागांपैकी ६४ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर बीआरएसच्या वाट्याला फक्त ३९ जागा आल्या. परंतु या निवडणुकीत भाजपच्या एका उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण भाजपच्या उमेदवाराने भावी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आहे. २०१८ च्या निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघात बीआरएसचे उमेदवार गम्पा गोर्वधन यांनी मिळवला होता. त्यांनी काॅंग्रेसचे मोहम्मद अली शब्बीर यांचा पराभव केला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघ काॅंग्रेसला मिळाला होता. मात्र २०२३ मध्ये यावर आता भाजपने कब्जा केलाय.
हेही वाचा…“इडीने मुंबई अन् दिल्लीतलं घर का ताब्यात घेतलं? त्याचाही पुस्तकात उल्लेख करावा,” शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी कामारेड्डी या मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. त्याच मतदारसंघातून भाजपकडून वेंकट रमण रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती. काॅंग्रेसने संपुर्ण तेलंगणात धक्कादायक निकाल दिला. परंतु कामारेड्डी मतदारसंघात वेंकट रमण रेड्डी हे जायंट किलर ठरले आहे. त्यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांचा तीन हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. तर काॅंग्रेसचे भावी मुख्यमंत्री म्हणून गणले जाणारे रेवंत रेड्डी हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक
५३ वर्षीय कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी व्यावसायिक असून त्यांनी केवळ १२ पर्यंत शिक्षण घेतलेय. निवडणुक अर्जात घोषित केलेल्या संपत्ती विवरणात त्यांच्याकडे फक्त ५० कोटींची संपत्ती असून व्यावसायिक ते राजकीय नेते बनलेल्या रेड्डी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भावी मुख्यमंत्र्यांना पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे त्यांची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
रेड्डी यांच्यावर आतापर्यंत ११ गुन्हे दाखल असून कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात अनेक शाळा व रूग्णालये त्यांनी सुरू केली आहेत. याच कारणामुळे त्यांनी दिग्गज नेत्यांवर बाहुबली विजय मिळवला आहे. यातच रेड्डी यांच्या विजयामुळे सोलापुरच्या एका तरूणाचा मोलाचा वाटा राहिला आहे. सचिन कल्याण शेट्टीं असे त्याचे नाव असून प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. मतदारसंघात तब्बल दोन महिने तेथेच तळ ठोकला होता. याकाळात त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, सभा घेत पुर्ण प्रचार यंत्रणा राबविली होती.
READ ALSO :
हेही वाचा…राजस्थानमध्ये काॅंग्रेसला धोबीपछाड, कोण होणार मुख्यमंत्री ? भाजपच्या ‘या’ महिला नेत्या शर्यरीत
हेही वाचा…इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना
हेही वाचा…मोठी बातमी…! “एकाची गाडी फोडली आता दुसऱ्याच्या घरावर दगडफेक,”जालन्यात मोठा राडा, दोन माजी मंत्री टार्गेटवर
हेही वाचा…राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक, टोपेंनी ‘या’ माजी मंत्र्यांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…“बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?”, जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सरकारला सवाल