मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहेत. यातच कालच्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजपचे नेते नाराज झाल्याने शिंदे आणि फडणवीसांच्या महायुतीत अस्वस्थता पसरल्याचं दिसत आहे. यातच शिवसेना आणि भाजपमधील वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षांतील वरिष्ट नेत्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं समजत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सवाल केले आहेत.
हेही वाचा…“इजा कानाला झालेली नव्हती तर मनाला झाली होती, त्यामुळेच आज पुन्हा नवीन जाहिरात”
ज्या जाहिराती दिल्या आहेत. त्या जाहिरातीचे पैसे कुणी दिले आहेत. ते देखील जनतेला कळायला हवे. जनतेच्या करातून सरकारच्या तिजोरीत पैसा येतो. त्यातून सरकारच्या जाहिराती दिल्या जातात. आजच्या जाहिरातीत बदल करून आज पुन्हा जाहिराती देण्यात आली आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
ज्यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेत. त्याच प्रमुख पक्षाला हा खोडसाळपणा वाटतोय. सरकारचं हसं करून घेण्यामध्ये कालची जाहिरात छापण्यात आली. त्याच्यामागे कोण करतंय हे समजलं पाहिजे.असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात फडणवीसांच्या सभांचा सिलसिला सुरू होणार, भाजपने मोठी रणनीती आखली
हेही वाचा…महायुतीत ठिणगी…! एकनाथ शिंदेंना ठाणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र वाटलं का ? भाजपच्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…“राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मनसैनिकांनी हनुमानाला घातला नवस,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“४८ मतदारसंघापैकी हे २१ लोकसभा मतदारसंघ काॅंग्रेससाठी पोषक”, काॅंग्रेसचा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरला
हेही वाचा…केंद्रात ‘मोदी’ भाकरी फिरवणार, महाराष्ट्रात ‘या’ राज्यसभेच्या खासदारांना औटघटका ?