मुंबई : सरकारला अजून किती वेळ पाहिजे? हा जरांगे पाटलांच्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे का ? सरकारचं शिष्टमंडळ त्यांना जरूर भेटावं हा त्यांचा अधिकार आहे. असं म्हणत इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य व्हावी, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ते करणं फक्त केंद्र सरकारच्याच हातात आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारामध्ये गुंतले असल्याची टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा…“आपल्या भावाचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढू नका”,सुळेंना चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
महाराष्ट्र पेटत असतांना नरेंद्र मोदी प्रचारामध्ये गुंतलेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मिझोरम पासून छत्तीसगड पर्यंत फिरत आहेत. महाराष्ट्रामध्ये या प्रश्नावरून लोक आत्महत्या करीत आहेत. मनोज जरांगे पाटलांचं आयुष्य पणाला लागतं आहे. त्यांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? असा सवाल देखील राऊतांनी राज्य सरकारला केला आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा मंत्री हसन मुश्रीफांना दणका, मुंबईत तिघांनी गाडी फोडली
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोज जरांगे पाटलांशी फोनवरून निधान बोलायला तरी पाहिजे होतं. परंतु ते देखील त्यांना वेळ नाही. एक एक तास मन की बात करता. जगभरात फिरतात. नेत्यांना मिठ्ठ्या मारतात. परंतु महाराष्ट्रातील एक कार्यकर्त्यानें समाजासाठी जीवनपणाला लावलं आहे. त्यांच्याशी संवाद साधायला वेळ नाही. असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर मराठा आरक्षणासाठी नाही तर खुर्ची वाचवण्यासाठी गेले आहेत. आपले अपात्र आमदार वाचावयला गेले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी काय आदेश द्यावे यासाठी गेले आहेत. त्यांना कुठे महाराष्ट्राची चिंता आहे. ? असा खोचक सवालही केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…राज्याचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘त्या’ पत्रात कोणत्या गोष्टी असणार ?
हेही वाचा…राज्यात मराठा आरक्षण गाजत असतांना अनेकांनी हाताला बांधलं घड्याळ, मुंबईत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
हेही वाचा…अजित पवार गटाच्या नेत्यासाठी सुप्रिया सुळे धावल्या, फडणवीसांवर केले कडक प्रहार
हेही वाचा…“अध्यक्षांची आधी गाडी अडवली अन् नंतर निवेदन दिले,” राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…