नाशिक – शरद पवार साहेबांची कोणाला अॅलर्जी असण्याचे कारण नाही. त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी गोपीळचंद पडळकरांना उत्तर दिले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांना शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, असा सल्ला दिलाय. खरे तर दोन महिन्यांपासून जास्त चाललेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुढाकार घेतला. त्यांच्या विनंतीला मान देत अनेक संघटनांनी या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यावरून पडळकर आक्रमक झाले.
आता आमचं नवीन ठरलंय; जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीआधीच खासदार मंडलिकांनी उडवली खळबळ
पडळकरांना छगन भजबळ यांनी नाशिकमधून मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर महाविकास आघाडीची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी आहे. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे. गिरणी कामगारांचा संप अजून संपला, असं कोणी जाहीर केलेला नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणं योग्य नाही. कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम असल्याची आठवण त्यांनी पडळकरांना करून दिली.
४० वर्ष भाजपात होतो तेव्हा एकनाथ खडसे चांगला, अन् आता लगेचच वाईट? खडसेंचा भाजपला सवाल
पडळकर काय म्हणाले?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य करताना, आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत?असा सवाल केलाय. सोबतच अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की, मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल, याची आठवण देखील पडळकर यांनी करुन दिली. माझ्या विनंतीचा नाही, तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असे आवाहन केले आहे.
Read also:
- पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला
- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
- पूलाच्या कामाला चतुराई दाखवली तशी रस्ता, खावटी योजनेचे पैसे, पोषण आहारालाही दाखवा – चित्रा वाघ
- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी गिरीश महाजन अडचणीत; पोलिसांना सापडली टेम्पोभर कागदपत्रे
- शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला